Abdu Rozik चे लग्न 7 जुलैला होणार नाही; करियरमुळे गायकाने घेतला मोठा निर्णय
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
अब्दू रोझिकहा एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि गायक आहे. तो ताजिक गायकही आहेत. टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेला गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच कोट्यवधींची कमाई केली आहे. अब्दू रोजिक सलमान खानच्या ‘बिग बॉस १६‘ या शोमध्येही सहभागी झाला होता. या शोमुळे त्याने भारतीय प्रेक्षकांच्या मनात त्याने खास स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. नुकतेच अब्दूने सांगितले होते की, त्याचे लग्न ठरले आहे आणि तो ७ जुलै रोजी आपल्या प्रेयसीशी लग्न करणार आहे. मात्र, आता त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.(Abdu Rozik Wedding Postponed)
अब्दू रोजिक चे ७ जुलै रोजी लग्न होणार होते. पण आता बिग बॉस 16 फेम गायकाने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. याचे कारण म्हणजे त्याचे करियर. दुबईतील कोका कोला एरिना येथे ६ जुलै रोजी होणाऱ्या बॉक्सिंग च्या लढतीत अब्दू रोझिकला बॉक्सिंग फाइट ऑफर देण्यात आली आहे. यामुळे त्याने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्याने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
तो मुलाखतीत म्हणाला की, ”आयुष्यात त्याला या बॉक्सिंग फाइट ऑफरसाठी लढण्याची संधी मिळेल, असे मला कधी वाटले नव्हते. या वर्षी माझ्या लव्ह लाईफ आणि करिअरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. दुर्दैवाने, मला सामन्यासाठी लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागेल कारण यामुळे भविष्यासाठी मोठी आर्थिक सुरक्षा मिळेल. अमिरा माझ्या निर्णयाचे पूर्ण पणे समर्थन करते कारण यामुळे खूप फरक पडेल. माझ्या आकाराच्या व्यक्तीसाठी हे पहिलीच फाइट ऑफर आहे आणि मला आजकाल कठोर सराव करावा लागत आहे.”(Abdu Rozik Wedding Postponed)
अब्दू रोजिकच्या लग्नाचे नवे अपडेट समोर आलेले नाही. पण चाहते त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अब्दू रोजिकचे लग्न पुढे ढकलण्याचे कारण त्याचे करिअर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रेमावर करियर भारी पडले अशाही कमेंट्स आता समोर येऊ लागल्या आहेत.
पंजाबी इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध संगीतकार आणि गायक म्हणजे दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) . मधल्या काही काळापासून दिलजीत हे नाव फक्त पंजाबी इंडस्त्रीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगभर गाजताना दिसत आहे. दिलजीतचे संपूर्ण जगभर कोट्यवधी फॅन्स आहेत. तो आणि त्यांचे विविध कॉन्सर्ट्स तुफान गाजतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात. (Diljit Dosanjh) गेल्या काही दिवसांपासून दिलजीत त्याच्या साध्य सुरु असलेल्या म्युझिक टूर मुळे (Music Tour) तुफान गाजत आहे. आज दिलजीत दोसांझ त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. दिलजीत दोसांझचा जन्म ६ जानेवारी १९८४ रोजी झाला. आज त्याचा ४१ वा वाढदिवस आहे. दिलजीतच्या वाढदिवसाच्या निमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही गोष्टी. (Bollywood Tadka) दिलजीत दोसांझ पूर्वी फक्त पंजाबी इंडस्ट्री मध्ये (Punjabi Indastri) प्रसिद्ध होता. मात्र आता तो हिंदी सिनेसृष्टीमधे देखील कमालीचा लोकप्रिय आहे. केवळ संगीत क्षेत्रात नाही तर त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. दिलजी...
चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. मधल्या काळात लॉस एंजलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे ९७वा आॉस्कर पुरस्कार सोहळा यावर्षी रद्द होणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र, या मोठ्या हानीतून वर येत अखेर ऑस्कर २०२५ चा पुरस्कार सोहळा होणार आहे. यावर्षी भारतीय चित्रपटांकडून सगळ्यांनाच आशा असून हा पुरस्कार सोहला कुठे पाहता येईल हे जाणून घ्या… प्रतिष्ठित ऑस्कर २०२५ पुरस्कार सोहळ्याचा काऊंटर डाऊन सुरु झाला असून ३ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता ऑस्कर सोहळा भारतात लाईव्ह पाहता येणार आहे. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. भारतात स्टार मूव्हीज सिलेक्ट या टीव्ही चॅनलवर, जिओस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘ऑस्कर २०२५’ चं लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. तसेच, हा पुरस्कार सोहळा अमेरिकन वेळेनुसारABC टीव्हीवर रात्री ७ वाजता टेलिकास्ट केला जाईल. ‘ऑस्कर २०२५’ मध्ये या भारतीय चित्रपटांकडे विशेष लक्ष यंदा ऑस्कर २०२५ मध्ये जागतिक चित्रपटांच्या शर्यतीत भारतीय चित्रपट असून सगळ्यांचंच लक्ष हा सोहळ्याकडे लागलंय. या वर्षी भार...
Preamachi Gosht 2: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणारे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा करत आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ ती सध्या काय करते ’ या चित्रपटांतून प्रेमाच्या अनेक छटा दाखवणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे आता ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ची कथा केवळ तरुण तरुणी भोवती फिरणारी होती. तर ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ कोणत्याही सिक्वेलसारखा नसलेला कथा पुढे नेणारा एक चित्रपट होता आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ यातही एक अनोखा दृष्टीकोन पाहायला मिळाला. सतीश राजवाडे यांच्या ’प्रेमाची गोष्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली. ( Preamachi Gosht 2) दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची ही भावनिक कहाणी होती. तर ‘ती सध्या काय करते’ मध्ये बालपणाच्या प्रेमाची आठवण करून देणारी गोड गोष्ट होती. या सगळ्या चित्रपटांनंतर आता ‘ प्रेमाची गोष्ट २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे नाव...
Comments
Post a Comment