Abdu Rozik चे लग्न 7 जुलैला होणार नाही; करियरमुळे गायकाने घेतला मोठा निर्णय
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
अब्दू रोझिकहा एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि गायक आहे. तो ताजिक गायकही आहेत. टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेला गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच कोट्यवधींची कमाई केली आहे. अब्दू रोजिक सलमान खानच्या ‘बिग बॉस १६‘ या शोमध्येही सहभागी झाला होता. या शोमुळे त्याने भारतीय प्रेक्षकांच्या मनात त्याने खास स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. नुकतेच अब्दूने सांगितले होते की, त्याचे लग्न ठरले आहे आणि तो ७ जुलै रोजी आपल्या प्रेयसीशी लग्न करणार आहे. मात्र, आता त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.(Abdu Rozik Wedding Postponed)
अब्दू रोजिक चे ७ जुलै रोजी लग्न होणार होते. पण आता बिग बॉस 16 फेम गायकाने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. याचे कारण म्हणजे त्याचे करियर. दुबईतील कोका कोला एरिना येथे ६ जुलै रोजी होणाऱ्या बॉक्सिंग च्या लढतीत अब्दू रोझिकला बॉक्सिंग फाइट ऑफर देण्यात आली आहे. यामुळे त्याने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्याने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
तो मुलाखतीत म्हणाला की, ”आयुष्यात त्याला या बॉक्सिंग फाइट ऑफरसाठी लढण्याची संधी मिळेल, असे मला कधी वाटले नव्हते. या वर्षी माझ्या लव्ह लाईफ आणि करिअरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. दुर्दैवाने, मला सामन्यासाठी लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागेल कारण यामुळे भविष्यासाठी मोठी आर्थिक सुरक्षा मिळेल. अमिरा माझ्या निर्णयाचे पूर्ण पणे समर्थन करते कारण यामुळे खूप फरक पडेल. माझ्या आकाराच्या व्यक्तीसाठी हे पहिलीच फाइट ऑफर आहे आणि मला आजकाल कठोर सराव करावा लागत आहे.”(Abdu Rozik Wedding Postponed)
अब्दू रोजिकच्या लग्नाचे नवे अपडेट समोर आलेले नाही. पण चाहते त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अब्दू रोजिकचे लग्न पुढे ढकलण्याचे कारण त्याचे करिअर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रेमावर करियर भारी पडले अशाही कमेंट्स आता समोर येऊ लागल्या आहेत.
अनेक बाबतीत आपण असंवेदनशील (अथवा शॉकप्रुफ) झालो असल्याच्या आजच्या अतिशय वेगवान, स्पर्धात्मक आणि व्यावहारिक युगात विजय देवरकोऺडा आणि रश्मिका मंदाना यांच्या २६ फेब्रुवारी रोजीच्या शाही लग्नाच्याएक्सलुझिव्ह कव्हरेजचे हक्क फक्त आणि फक्त साठ कोटी रुपयांत हवेत अशा नेटफ्लिक्सच्या ऑफरचे कसलेही आश्चर्य वाटले नाही. सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीला किंमत मिळण्याच्या आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला या लग्नाचा थाटमाट पाह्यचाय आणि तो आपणच दाखवावा असे एखाद्या यू ट्यूब चॅनेलला वाटणे अगदी स्वाभाविक आहे. खरं तर एकाच का? इतरही यू ट्यूब चॅनेल्सनी याच हाय प्रोफाईल लग्नाची तयारी, महाखर्चिक मंडप, संगीत नृत्याची धमाल,वधु वराची वस्त्रे, बाराती, नाचकाम, सेलिब्रिटी पाहुणे, त्यांचा छान छान महाग अति महाग स्टायलिश लूक, लग्नातील अनेक प्रकारचे स्टार्टर्स आणि जेवणावळ, वधुचे नवीन शैलीतील मंगळसूत्र, साऊथच्या भाषेतील उखाणा, त्याचे मग हिदीकरण, या लग्नाच्या थाटमाटातील भले मोठे मोठे हार (ही दक्षिण भारतातील संस्कृती) अशा अनेक गोष्टींबाबत जनसामान्यांना असलेले कौतुक आणि कुतूहल हे विक्रमी लाईक्स देणारे आहे. मग ...
मराठी सिनेमा हा कायमच नवनवीन, धाडसी विषयांना हात घालण्यासाठी ओळखला जातो. याच कडीत दिग्दर्शक समीर तिवारी यांचा Baapya Movie एक अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची, संघर्षाची नाही, तर त्यापलीकडे जाऊन समाज, कुटुंब व मानवी नात्यांच्या मानसिकतेचीही परीक्षा घेणारी आहे. समाजात Tabbo मानल्या जाणाऱ्या अनेक विषयांपैकी एक विषय घेऊन त्यावर मराठीत सिनेमा बनवण्याचं धाडस करण्यासाठी निर्मात्यांचं खास कौतुक करायला हवं! चित्रपटाची कथा सुरू होते ती, कोकणातल्या एका गावात! शैला ( Rajshri Deshpande ) जी अनेक वर्षांनी आपल्या गावी परतते, ती थेट ‘शैलश’ बनून! तिचं हे बदललेलं रूप तिच्या कुटूंबाला व संपूर्ण गावालाच थक्क करतं. तिचं बालपण, मनाची अवस्थता, कुटुंबात होणारी भावनिक उलथापालथ आणि या सगळ्यातून स्वतःची ओळख शोधण्याचा व ते अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष म्हणजे ‘बाप्या’! ‘बाप्या’ हा केवळ एका ‘स्त्री’तील पुरूषाच्या अस्तित्वाचा प्रवास नाही, तर तो समाजातल्या बदलांचा देखील प्रवास आहे. कोकणासारख्या गावात ‘Trans-Men’ सारख...
अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ? अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा बॉलीवूड चे दोन महान कलाकार. एक कमर्शियल सिनेमाचा शहेनशहा तर दुसरा आर्ट फिल्म चा आयकॉनिक ऍक्टर. या दोन कलाकारांनी आजवर कधीच एकत्र काम केलेले नाही आणि भविष्यात एकत्र काम करण्याची सुतराम शक्यता नाही! या दोघांना घेऊन एखादा चित्रपट करावा असे कुणा निर्मात्याला ही कधी वाटले नाही. नासिर ने काही कमर्शियल सिनेमे नक्कीच केले. अमिताभ बच्चन यांनी देखील काही आर्ट फिल्म्स केल्या. पण या दोघांचं करिअर समांतरच राहिले! अमिताभ बच्चन कधीच कोणत्याही कलाकारावर आपत्ती जनक टिप्पणी करत नाही. अमिताभ नेहमीच एका स्टॅंडर्ड उंचीवर राहून लाईम लाईट मध्ये वावरत असतो. या उलट नसिरुद्दीन शहा ने एकदा एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि त्याच्या चित्रपटावर भरपूर टीका केली होती. या मुलाखतीत त्याने अमिताभ बच्चन काही महान कलाकार महान वगैरे कलाकार नाहीत असे जाहीर पणे सांगितले होते . तो केवळ स्टंट मन एक बिझनेसमन आहे आणि त्या पद्धतीने तो या व्यवसायात आलेला आहे असे उदगार देखील क...
Comments
Post a Comment