Abdu Rozik चे लग्न 7 जुलैला होणार नाही; करियरमुळे गायकाने घेतला मोठा निर्णय
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
अब्दू रोझिकहा एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि गायक आहे. तो ताजिक गायकही आहेत. टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेला गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच कोट्यवधींची कमाई केली आहे. अब्दू रोजिक सलमान खानच्या ‘बिग बॉस १६‘ या शोमध्येही सहभागी झाला होता. या शोमुळे त्याने भारतीय प्रेक्षकांच्या मनात त्याने खास स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. नुकतेच अब्दूने सांगितले होते की, त्याचे लग्न ठरले आहे आणि तो ७ जुलै रोजी आपल्या प्रेयसीशी लग्न करणार आहे. मात्र, आता त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.(Abdu Rozik Wedding Postponed)
अब्दू रोजिक चे ७ जुलै रोजी लग्न होणार होते. पण आता बिग बॉस 16 फेम गायकाने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. याचे कारण म्हणजे त्याचे करियर. दुबईतील कोका कोला एरिना येथे ६ जुलै रोजी होणाऱ्या बॉक्सिंग च्या लढतीत अब्दू रोझिकला बॉक्सिंग फाइट ऑफर देण्यात आली आहे. यामुळे त्याने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्याने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
तो मुलाखतीत म्हणाला की, ”आयुष्यात त्याला या बॉक्सिंग फाइट ऑफरसाठी लढण्याची संधी मिळेल, असे मला कधी वाटले नव्हते. या वर्षी माझ्या लव्ह लाईफ आणि करिअरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. दुर्दैवाने, मला सामन्यासाठी लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागेल कारण यामुळे भविष्यासाठी मोठी आर्थिक सुरक्षा मिळेल. अमिरा माझ्या निर्णयाचे पूर्ण पणे समर्थन करते कारण यामुळे खूप फरक पडेल. माझ्या आकाराच्या व्यक्तीसाठी हे पहिलीच फाइट ऑफर आहे आणि मला आजकाल कठोर सराव करावा लागत आहे.”(Abdu Rozik Wedding Postponed)
अब्दू रोजिकच्या लग्नाचे नवे अपडेट समोर आलेले नाही. पण चाहते त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अब्दू रोजिकचे लग्न पुढे ढकलण्याचे कारण त्याचे करिअर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रेमावर करियर भारी पडले अशाही कमेंट्स आता समोर येऊ लागल्या आहेत.
अनेक बाबतीत आपण असंवेदनशील (अथवा शॉकप्रुफ) झालो असल्याच्या आजच्या अतिशय वेगवान, स्पर्धात्मक आणि व्यावहारिक युगात विजय देवरकोऺडा आणि रश्मिका मंदाना यांच्या २६ फेब्रुवारी रोजीच्या शाही लग्नाच्याएक्सलुझिव्ह कव्हरेजचे हक्क फक्त आणि फक्त साठ कोटी रुपयांत हवेत अशा नेटफ्लिक्सच्या ऑफरचे कसलेही आश्चर्य वाटले नाही. सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीला किंमत मिळण्याच्या आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला या लग्नाचा थाटमाट पाह्यचाय आणि तो आपणच दाखवावा असे एखाद्या यू ट्यूब चॅनेलला वाटणे अगदी स्वाभाविक आहे. खरं तर एकाच का? इतरही यू ट्यूब चॅनेल्सनी याच हाय प्रोफाईल लग्नाची तयारी, महाखर्चिक मंडप, संगीत नृत्याची धमाल,वधु वराची वस्त्रे, बाराती, नाचकाम, सेलिब्रिटी पाहुणे, त्यांचा छान छान महाग अति महाग स्टायलिश लूक, लग्नातील अनेक प्रकारचे स्टार्टर्स आणि जेवणावळ, वधुचे नवीन शैलीतील मंगळसूत्र, साऊथच्या भाषेतील उखाणा, त्याचे मग हिदीकरण, या लग्नाच्या थाटमाटातील भले मोठे मोठे हार (ही दक्षिण भारतातील संस्कृती) अशा अनेक गोष्टींबाबत जनसामान्यांना असलेले कौतुक आणि कुतूहल हे विक्रमी लाईक्स देणारे आहे. मग ...
योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा। विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी। शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश। विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा। “प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्मिक तेजाचे दीपप्रज्वलित करत संपूर्ण विश्वासाठी ‘पसायदान’रूपी विश्वप्रार्थना लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज अवघ्या विश्वाचे माऊली बनले. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची चरित्रगाथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. माउलींचे समता, बंधुतेचे विचार आणि आचरण यांचे आदर्श उलगडून दाखवतानाच प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शनही अनुभवायास मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.(Sant Dnyaneshwaranchi Muktai Music Launch) Latest Marathi Movies...
हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्षांपेक्षा अधिक काळ विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री काजोल (Kajol) हिला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे काजोलला तिच्या वाढदिवशी ५ ऑगस्टलाच हा मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला… यावेळी काजोलने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी जेव्हा तिला हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ती भडकली अन् म्हणाली, “अब मैं हिंदी में बोलो??? जिसको समझना है, वो समझ लेंगे.” नक्की काय घडलं? (Bollywood News) Bollywood Tadka यावेळी माध्यमांशी बोलताना काजोल म्हणाली की,”हा पुरस्कार मला या (वाढदिवसाच्या दिवशी) दिवशी भेटतोय. माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे. माझ्यासोबत आज माझी आई देखील आली आहे आणि तिलाही हा पुरस्कार आधी मिळाला होता. त्यामुळे ही माझ्यासाठी देखील फार महत्वाची गोष्ट आहे.”(Actress Tanuja) मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर काजोलला एका प्रतिनिधीने हिंदीत बोला असं म्हटलं. त्यावर काजोलचा पारा चढला. त्यावर तिने हिंदीतूनच त्याला...
Comments
Post a Comment