V Shantaram : शांताराम बापूंच्या करड्या शिस्तीचा फटका जितेंद्र यांना दोनदा बसला होता !
चित्रपती V. Shantaram अतिशय शिस्तीचे भोक्ते होते. सिनेमा बनवताना सर्व गोष्टी अचूक आणि ठराविक वेळेत व्हायला पाहिजे यावर त्यांचा विशेष कटाक्ष असायचा. त्याना बेशिस्त अजिबात खपायची नाही. त्याचा फटका अभिनेता Jeetendra ला दोनदा बसला होता. 1962 साली त्यांच्या ‘Sehra’ या सिनेमाची निर्मिती चालू होती. जितेंद्र आणि Sandhya ही स्टार कास्ट फायनल झाली होती. जितेंद्र खूष होता त्याचा हीरो म्हणून पहिलाच सिनेमा असणार होता. सर्व शूटिंग राजस्थान ला होणार होते. बापूंची तिथे करडी शिस्त असायची. सर्व युनिट ने एकत्र जेवायचे, रात्री दहा नंतर रूम मधील लाइट ऑफ! जितेंद्र तरुण होता. एकदा तो संध्याकाळी शूट झाल्यावर लोकेशन पासून बाहेर पडून मौज मस्ती साठी शहरात गेला. रात्री त्याला उशीर झाला. रात्री भोजनासाठी जितेंद्र सोबत नाही हे बापूच्या लक्षात आले, आणि वॉचमनला बजावून ठेवले “जितेंद्र रात्री किती जरी उशिरा आला तरी त्याला माझ्याकडे पाठव . रात्री उशिरा Jeetendra हालत डुलत आला. वॉचमन च्या निरोपाने त्याची धुंदी क्षणार्धात उतरली. तो लगेच बापूच्या आदेशाने त्याना भेटायला गेला. बापू जागेच होते. त्यानी सर्वा समक्ष त्याला प्रच...