Posts

Kalakruti Special : शाळा, काॅलेज आणि चित्रपट

चित्रपट माध्यम आणि व्यवसाय यांचा जनसामान्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींशी, जवळपास सर्वच सण संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, वाढदिवस घटक, लग्न संस्कृती यांच्याशी संबंध आहे. तसाच तो शाळा कॉलेज यांच्याशीही आहे. चित्रपटाच्या नावात ‘शाळा’ (मराठी), ‘स्टुडंट्स ऑफ द इयर’ (हिंदी) यापासून त्याची सुरुवात होते. खरं तर हा बहुस्तरीय, बहुढंगी, बहुरंगी विषय. त्यातही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील शिक्षणाचे धडे वेगळे आणि ‘इम्तिहान’ (Vinod Khanna आणि Tanuja) या चित्रपटातील गोष्ट वेगळी. आणखी एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, साठच्या दशकात विशेष: दक्षिण मुंबईत जन्माला आलेल्या माझ्या पिढीला प्राथमिक शाळेत असताना अनेकदा तरी रविवार सकाळ कधी येतेय असं व्हायचं. (दूरचित्रवाणी येण्यापूर्वीचा हा काळ. मध्यमवर्गीय सरळमार्गी जीवन) याचं कारण, रविवारी सकाळी नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेकदा तरी बालचित्रपटाचे खेळ असत आणि त्या वयात तसे चित्रपट पाहण्यात एक विशेष आनंद मिळे. ती मानसिक गरज असे. मला आठवतंय, आमच्या गिरगावातील मॅजेस्टीक, सेंट्रल, रॉक्सी या चित्रपटगृहात असा रविवार सकाळचा एक शो असे. कधी फक्त आम्हा शालेय विद...

Vyjayanthimala : यशाची हॅटट्रिक तरी वैजयंतीमालाने चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत केले….

आपण ऐन भरात असताना थांबण्याचा निर्णय घेणं चित्रपटाच्या जगात जवळपास अशक्यप्राय गोष्ट. चित्रपटसृष्टीत आपण वरच्या स्थानावर आहोत, पैशाची बॅग घेऊन बडे बडे निर्माते साईन करायला तत्पर आहेत, दिग्दर्शक पटकथा घेऊन सेटवर निघालेत, वितरक चढ्या किमतीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क घ्यायला तयार आहेत, फिल्म दीवाने आगाऊ तिकीट विक्रीसाठी लांबलचक रांगेत उभे राहून तिकीट काढण्यासाठी धडपडताहेत, फिल्म मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आकर्षक देखणी छबी झळकतेय, गाॅसिप्स मॅगझिनमधून असलेलं नसलेलं लफडे शिजवले जातेय, असं सगळं हवंहवंसं वाटतं असलेलं असूनही चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत करावं? येड लागले की काय? वैजयंतीमालाने ते केलं. आणि आपल्या या ठाम निर्णयापासून अजिबात फिरकत घेतली नाही. कमालीचा संयम ठेवला. H. S. Rawail दिग्दर्शित Sangharsh (१९६८) हा Dilip Kumar सोबतचा चित्रपट‌ साधारण यशस्वी ठरला, पण Rajaram आणि Satish Wagle निर्मित आणि Bhappi Sonie दिग्दर्शित Pyar Hi Pyar (१९६९) हा Dharmendra सोबतचा, F. C. Mehra निर्मित आणि Lekh Tandon दिग्दर्शित Prince (१९६९) हा Shammi Kapoor सोबतचा चित्रपट आणि Naresh Kumar ...

Naushad And Rafi: सुहानी रात ढल चुकी… एक अजरामर स्वर-प्रवास

भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा दोन नावांचा उल्लेख सुवर्ण अक्षरांनी करावा लागेल—संगीत मार्तंड Naushad Ali आणि स्वरसम्राट Mohammed Rafi. शास्त्रीय संगीताचा पाया, लोकसंगीताचा गोडवा आणि सिने-संगीताची गेयता यांचा सुरेख संगम घडवून आणणारे नौशाद आणि आपल्या स्वरांनी अवघ्या जगाला मोहिनी घालणारे रफी, ही जोडी म्हणजे भारतीय संगीताला लाभलेले एक लेणे आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे, या गुरु-शिष्यांचे जन्मदिनांकही एकापाठोपाठ येतात. २४ डिसेंबरला रफींचा वाढदिवस, तर २५ डिसेंबरला नौशाद साहेबांचा. निसर्गाची ही योजना जणू या दोन महान आत्म्यांनी एकत्र येऊन संगीताची सेवा करावी, यासाठीच होती. मोहम्मद रफी यांनी चित्रपट सृष्टीत पहिले गाणे संगीतकार Shyam Sundar यांच्याकडे गायले असले, तरी त्यांना खऱ्या अर्थाने पैलू पाडण्याचे काम नौशाद यांनी केले. १९४४ सालच्या Pehle Aap या चित्रपटात नौशाद यांनी रफींना प्रथम संधी दिली. यातील ‘हिंदोस्ताँ के हम हैं हिंदोस्ताँ हमारा’ या गाण्याचा किस्सा आजही तितकाच रंजक वाटतो. नौशाद यांना या गाण्यात केवळ आवाज नको होता, तर तो जोष आणि लष्क...

Kumkum : तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक लख्ख चमकणारा तारा म्हणजे अभिनेत्री Kumkum . पडद्यावरील त्यांचे सौंदर्य, सहज अभिनय आणि विशेषतः त्यांचे नृत्य आजही रसिकांच्या स्मरणात आहे. कुमकुम यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका रंजक योगायोगाने झाली. जेव्हा Guru Dutt आपला Aar Paar (१९५४) हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे घेऊन गेले, तेव्हा एका गाण्यावरून पेच निर्माण झाला. ‘कभी आर कभी पार लागा तीर-ए-नजर’ हे गाणे मूळतः गुरु दत्त यांनी बालकलाकार Jagdeep वर चित्रित केले होते. मात्र, एका पुरुषाने (किंवा मुलाने) अशा प्रकारचे रोमँटिक गाणे सादर करणे सेन्सॉर बोर्डाला रुचले नाही. त्यांनी हे गाणे एखाद्या स्त्री कलाकारावर चित्रित करण्याची अट घातली. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली होती आणि Guru Dutt यांच्याकडे वेळ कमी होता. अशावेळी त्यांनी नुकत्याच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेल्या Kumkum यांना बोलावले. त्यांची स्क्रीन टेस्ट घेतली गेली आणि या अजरामर गाण्यासाठी त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे, या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन खुद्द गुरु दत्त यांनीच केले होते. O. P. Nayyar यांच्या संगीताने सजलेले हे गाणे आणि कुमकुम यांच...

‘Khoobsurat’: The Film That Changed Rekha’s Career Forever

  The 1980 classic film “Khoobsurat,” directed by legendary filmmaker Hrishikesh Mukherjee, remains one of the most loved films in Indian cinema. More than just an entertaining family drama, the movie played a major role in transforming actress Rekha’s image in Bollywood. Before “Khoobsurat,” Rekha was often seen mainly as a glamorous actress. However, her role as the cheerful and mischievous “Manju” changed everything. Wearing simple cotton sarees and two braids, Rekha impressed audiences with her natural acting, comic timing, and emotional depth. The film highlighted her talent in a completely new way and eventually earned her the first Filmfare Award of her career for Best Actress. The story revolved around a strict family led by Dina Pathak’s character, where discipline dominated daily life. Rekha’s energetic character entered the household and slowly filled it with happiness, laughter, and warmth. The film beautifully balanced humour with emotional moments while delivering an ...

V Shantaram : शांताराम बापूंच्या करड्या शिस्तीचा फटका जितेंद्र यांना दोनदा बसला होता !

चित्रपती V. Shantaram अतिशय शिस्तीचे भोक्ते होते. सिनेमा बनवताना सर्व गोष्टी अचूक आणि ठराविक वेळेत व्हायला पाहिजे यावर त्यांचा विशेष कटाक्ष असायचा. त्याना बेशिस्त अजिबात खपायची नाही. त्याचा फटका अभिनेता Jeetendra ला दोनदा बसला होता. 1962 साली त्यांच्या ‘Sehra’ या सिनेमाची निर्मिती चालू होती. जितेंद्र आणि Sandhya ही स्टार कास्ट फायनल झाली होती. जितेंद्र खूष होता त्याचा हीरो म्हणून पहिलाच सिनेमा असणार होता. सर्व शूटिंग राजस्थान ला होणार होते. बापूंची तिथे करडी शिस्त असायची. सर्व युनिट ने एकत्र जेवायचे, रात्री दहा नंतर रूम मधील लाइट ऑफ! जितेंद्र तरुण होता. एकदा तो संध्याकाळी शूट झाल्यावर लोकेशन पासून बाहेर पडून मौज मस्ती साठी शहरात गेला. रात्री त्याला उशीर झाला. रात्री भोजनासाठी जितेंद्र सोबत नाही हे बापूच्या लक्षात आले, आणि वॉचमनला बजावून ठेवले “जितेंद्र रात्री किती जरी उशिरा आला तरी त्याला माझ्याकडे पाठव . रात्री उशिरा Jeetendra हालत डुलत आला. वॉचमन च्या निरोपाने त्याची धुंदी क्षणार्धात उतरली. तो लगेच बापूच्या आदेशाने त्याना भेटायला गेला. बापू जागेच होते. त्यानी सर्वा समक्ष त्याला प्रच...

50 Years of Charas : अखेरच्या क्षणी सेन्सॉरने म्हटले, चित्रपटाचे नाव बदला !

विदेशात अनेक ठिकाणी चित्रीकरण झाले, चित्रपटात अनेक खलनायक असल्याने मारधाड वाढली, चित्रपटाचे एकूणच बजेट वाढवावे लागले, तेही केले आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे दिला आणि सेन्सॉरने पहिला सल्ला दिला, या चित्रपटाचं नाव बदला… यामागचे कारण काय, तर देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली असून चित्रपट सेन्सॉर करण्यासाठीचे नियमही बदलले आहेत. त्यात ‘CHARAS’ हे नाव चित्रपटाला अजिबात चालणार नाही. अजून आणीबाणी कायम आहे हे सेन्सॉरचे म्हणणं. अनुभवी निर्माता आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांना प्रश्न पडला, आता काय करायचं? मुहूर्तापासूनच या चित्रपटाचे नाव ‘चरस’ आहे.‌ तेव्हापासून चित्रपट पूर्ण होईपर्यंत अनेकदा त्याच्या दोन चार रिळाच्या चित्रीकरणानंतर सतत बातम्या येत राहिल्या.‌ आता चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत, चित्रपटाची अनेक शहरांतून पोस्टर्स, होर्डिंग्जही लागली आहेत, अशा वेळी ऐन वेळी नाव कसे बदलणार? ते करायचं तर खूपच मोठा खर्च आला. सेन्सॉरला हे म्हणणं पटलं आणि ‘चरस’ सेन्सॉर संमत होऊन २८ मे १९७६ रोजी चित्रपट दणक्यात प्रदर्शित झाला. त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत...