Posts

Raja Shivaji Crowned Marathi Cinema's Biggest Blockbuster of 2026

Raja Shivaji has emerged as the highest-grossing Marathi film of 2026, crossing ₹130 crore worldwide and comfortably outpacing every other release in the industry this year. For an industry that often struggles to break out beyond its core Maharashtra audience, a number like this is a genuine milestone. Why the film has struck a chord Historical and biographical subjects have long been a strength of Marathi cinema, and Raja Shivaji arrives at a moment when audiences are visibly hungry for large-scale, big-screen storytelling rooted in Maharashtra's own history. The film's collections suggest it has pulled in not just the regular Marathi cinema crowd but a wider pan-India audience too. How it stacks up against the year's other big films Raja Shivaji's ₹130 crore haul puts real distance between it and the next biggest Marathi releases of 2026, including Deool Band 2 at around ₹52 crore. That gap tells its own story about how far a well-marketed, well-mounted Marathi film ...

Maaficha Sakshidar सत्य घटनेवर आधारित होता, पण…

  ‘सत्य घटनेवर आधारित चित्रपट’ हा चित्रपट निर्मितीतील एक महत्त्वाचा फंडा. आणि त्यात जर ती सत्य घटना खुनाच्या मालिकेची असेल तर? सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील पुणे शहरातील अशीच एक अतिशय भयावह खुनांची मालिका. त्यामुळे पुणे झालेच, पण संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ती भयावह गोष्ट म्हणजे, जोशी आणि अभ्यंकर या कुटुंबीयांची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि त्याहीपेक्षा जास्त क्रूरपणे करण्यात आलेली हत्या. या घटनेमुळे संपूर्ण समाजात प्रचंड भीती निर्माण झाली होती आणि ते स्वाभाविक होतेच. पोलिसांनी चक्रे फिरवली आणि काही दिवसांनी या हत्या प्रकरणांत काही सुशिक्षित आणि उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली. हे सगळेच प्रकरण चक्रावून टाकणारे होते. यामागची कारणे आणि मानसिकता याची त्या काळात बरीच चर्चा झाली. या प्रकरणाने एकूणच समाज ढवळून निघाला होता. याच अतिशय धक्कादायक प्रकरणावर निर्माते Hiralal Shah यांनी चित्रपट निर्मितीचे पाऊल टाकले. या चित्रपटाचे दिग्दर्शक Rajdutt आणि पटकथा व संवादलेखन Madhusudan Kalelkar यांचे. आणि या चित्रपटाचं नाव “माफीचा साक्षीदार”. Hem Hira Chitra या बॅनरखाली असा चित्रपट निर्माण ...

Rakesh Roshan‌ : राकेश रोशन दिग्दर्शक म्हणून जास्त चमक

कारकिर्दीचे श्रेत्र कोणतेही असो, यशापयशाच्या चढउतारात, खेळात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि हिंमत हवी, यश नक्कीच आहे. Rakesh Roshan ‌ याबाबत उत्तम उदाहरण. संगीतकार Roshan यांच्या दोन मुलांमधील एक राकेश रोशन अभिनयाच्या क्षेत्रात आला, दुसरा Rajesh Roshan संगीतकार म्हणून या क्षेत्रात आला. कौटुंबिक पार्श्वभूमी कशीही असली तरी स्वतःलाच सिद्ध करावे लागते. नशिबाची साथ संगत मिळेल, न मिळेल, तरी काही कर्तृत्व सिद्ध झाले तर वाटचाल सुकर होते. नायक म्हणून संधी मिळतेय, पण अपेक्षित उंची गाठता येत नाही, आपण सहनायक म्हणून काम करुया, राकेश रोशनने घेतलेला निर्णय अंमलात आणला. हे करताना चित्रपटसृष्टीत काही चांगले मित्र जोडले. विशेषतः Jeetendra आणि Rishi Kapoor हे एकदम खास मित्र. या तिघांची मैत्री कायमच कौतुकाची राहिली. Prem Chopra , Ranjeet , Asrani असा आणखी मित्रपरिवार वाढला. सहनायक, दुसरा नायक अशी वाटचाल सुरू असतानाच Rakesh Roshan ने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले. Film Kraft असं आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेला नाव दिले. त्याचे सासरे J. Om Prakash हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी, मु...

Cinema Cinema: ‘सिनेमा सिनेमा’ मनोरंजनाच्या चष्म्यातून पाहिलेला भारतीय चित्रपटसृष्टीचा देदीप्यमान इतिहास

Krishna Shah दिग्दर्शित १९८० मधील Cinema Cinema हा चित्रपट केवळ भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगणारा माहितीपट नाही, तर तो या देशाच्या संस्कृतीचे, भावनांचे आणि बदलत्या समाजाचे रुपेरी पडद्यावर उमटलेले प्रतिबिंब आहे, जे Hollywood आणि इतर जागतिक सिनेमाच्या तुलनेत भारतीय सिनेमाचे अनोखे वेगळेपण अत्यंत ठळकपणे या चित्रपटातून प्रकट करते. ऐंशीच्या दशकात जेव्हा बॉलीवूडमध्ये केवळ मारधाड आणि व्यावसायिक मसाला चित्रपटांचे राज्य होते, अशा काळात Krishna Shah यांनी अत्यंत धाडसी आणि कल्पक प्रयोग करत या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मांडणी ही केवळ जुन्या क्लिप्सची जोडणी नसून चित्रपटगृहातील प्रेक्षक, पडदा आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ यांच्यातील भावनिक नाते जिवंत करणारा एक अनोखा सादरीकरणपट ठरला. या चित्रपटात Amitabh Bachchan , Dharmendra , Zeenat Aman आणि Hema Malini यांसारख्या दिग्गज कलाकारांनी केलेले सूत्रसंचालन आणि निवेदन चित्रपटाला एकीकडे प्रचंड स्टार व्हॅल्यू आणि ग्लॅमर मिळवून देते, तर दुसरीकडे त्या त्या काळातील आघाडीच्या स्टार्सच्या पाठींब्यामुळे या चित्रपटाला ...

Dharmendra And Hema Malini : धर्मेंद्रच्या या गाण्यावर हेमा मालिनी जाम फिदा होती!

Dharmendra आणि Hema Malini म्हणजेच बॉलिवूडची एक अशी सदाबहार जोडी, जिने सत्तर आणि ऐंशीच्या दशकात रुपेरी पडद्यावर अक्षरशः राज्य केले. या रोमँटिक जोडीने आपल्या कारकिर्दीत तब्बल 25 चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केला होता आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक सिनेमे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. Sharafat , Tum Haseen Main Jawan , Naya Zamana , Raja Jani , Seeta Aur Geeta , Sholay , Pratigya आणि Charas अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश होतो. पडद्यावर Dharmendra आणि Hema Malini यांची जोडी एकत्र दिसणार म्हटल्यावर सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागायच्या. त्यांच्यातील On-Screen Chemistry इतकी नैसर्गिक, उत्कट आणि जिवंत असायची की प्रेक्षक त्यात पूर्णपणे हरवून जायचे. चित्रपटांच्या सेटवर एकत्र काम करता करता या दोघांच्या खऱ्या आयुष्यातही प्रेमाचा अंकुर फुलत गेला आणि बॉलिवूडची सर्वात गाजलेली Real Life Love Story सुरू झाली. परंतु, या दोघांच्या प्रेमकथेची खरी सुरुवात Tum Haseen Main Jawan या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्याही आधी, धर्मेंद्र यांच्या एका अजरामर गाण्याने झाली होती हा इत...

V. Shantaram : चित्रपती व्ही. शांताराम आणि पाकिस्तानी शायर कतील शिफई यांच्या ऐतिहासिक भेटीची सुवर्णगाथा!

भारतीय चित्रपटसृष्टी आणि ऊर्दू साहित्याचा इतिहास हा केवळ व्यावसायिक गणितांचा नसून, तो दोन देशांमधील संस्कृती, कला आणि मानवी भावनांना जोडणारा एक भक्कम पूल आहे. या पुलावरील सर्वात देखणे आणि डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे एक पान म्हणजे भारतातील चित्रपट महर्षी, Rajkamal Kalamandir चे निर्माते-दिग्दर्शक चित्रपती V. Shantaram आणि Pakistan चे अत्यंत लोकप्रिय, ज्येष्ठ शायर व गीतकार Qateel Shifai यांच्यातील अभूतपूर्व भेट होय. कतील शिफई हे केवळ एक कवी नव्हते, तर ते मानवी मनाच्या कोमल भावना, प्रेम, विरह आणि सामाजिक जाणिवा अत्यंत सुगम, पण तितक्याच प्रभावी ऊर्दू आणि हिंदी शब्दांत मांडणारे साहित्याचे एक अथांग दालन होते. जगभरातील संगीत आणि साहित्यप्रेमींनी त्यांच्या लेखनावर भरभरून प्रेम केले आहे. त्यांनी लिहिलेली Mohe Aayi Na Jag Se Laaj, Ke Ghungroo Toot Gaye ही नृत्याधारित रचना आजही भारतीय शास्त्रीय आणि सुगम संगीताचा सर्वोच्च मानदंड मानली जाते. Qateel Shifai यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य असे होते की, त्यांच्या लेखनात Punjab ची माती, ऊर्दूची नजाकत आणि जनसामान्यांच्या जगण्याचा संघर्ष अतिशय प्रामाणिकपणे...

Hemant Kumar : ओढ मातृभूमीचा हेमंत कुमार यांच्या वेस्ट इंडीज दौऱ्या चा भावस्पर्शी किस्सा

१९६४ हे वर्ष भारतीय चित्रपट आणि संगीत जगतातील एक अत्यंत देदिप्यमान आणि तितकेच संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेल्या Hemant Kumar यांच्या आयुष्यात कमालीचे वादळी ठरत होते. याच काळात त्यांनी West Indies चा आपला पहिला मोठा आणि ऐतिहासिक परदेश दौरा आखला. वेस्ट इंडीज मध्ये जावून कार्यक्रम करणारे ते पहिले भारतीय कलावंत होते! या संगीतमय प्रवासात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी Bela , त्यांचे निष्णात तबलावादक Pandit Sudarshan Adhikari आणि प्रतिभावान मॅन्डोलिन वादक Mahendra Bhavsar हे त्यांचे साऊंड ट्रॅक जिवंत करणारे मुख्य सहकारी होते. हा तो काळ होता जेव्हा हेमंत कुमार यांच्या Bees Saal Baad आणि Nagin यांसारख्या चित्रपटांमधील अजरामर गाण्यांनी संपूर्ण भारताला वेड लावले होते आणि त्यांच्या अथांग सुरांचे साम्राज्य देशभरात प्रस्थापित झाले होते. परंतु, दुसरीकडे व्यावसायिक गणिते काहीशी बिघडलेली होती; Kohraa या त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत एक अतिशय कठीण आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक काळ सुरू झाला होता. अशा स्थितीत Hemant Kumar यांच...