Posts

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?

  अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ? अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा बॉलीवूड चे दोन महान कलाकार.  एक कमर्शियल सिनेमाचा शहेनशहा तर दुसरा आर्ट  फिल्म चा आयकॉनिक ऍक्टर. या दोन कलाकारांनी आजवर कधीच एकत्र काम केलेले नाही आणि भविष्यात एकत्र काम करण्याची सुतराम शक्यता नाही! या दोघांना घेऊन एखादा चित्रपट करावा असे कुणा निर्मात्याला ही कधी वाटले नाही. नासिर ने काही कमर्शियल सिनेमे नक्कीच केले. अमिताभ बच्चन यांनी देखील काही आर्ट फिल्म्स केल्या.  पण या दोघांचं करिअर समांतरच राहिले! अमिताभ बच्चन कधीच कोणत्याही कलाकारावर आपत्ती जनक टिप्पणी करत नाही.  अमिताभ नेहमीच एका स्टॅंडर्ड उंचीवर राहून लाईम लाईट मध्ये  वावरत असतो.   या उलट नसिरुद्दीन शहा ने एकदा एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि त्याच्या चित्रपटावर भरपूर टीका केली होती. या मुलाखतीत त्याने अमिताभ बच्चन काही महान कलाकार महान वगैरे कलाकार नाहीत  असे जाहीर पणे सांगितले होते .   तो केवळ स्टंट मन एक बिझनेसमन आहे आणि त्या पद्धतीने तो या व्यवसायात आलेला आहे असे  उदगार देखील क...

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

  मराठी सिनेमा हा कायमच नवनवीन, धाडसी विषयांना हात घालण्यासाठी ओळखला जातो. याच कडीत दिग्दर्शक समीर तिवारी यांचा Baapya Movie एक अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची, संघर्षाची नाही, तर त्यापलीकडे जाऊन समाज, कुटुंब व मानवी नात्यांच्या मानसिकतेचीही परीक्षा घेणारी आहे. समाजात Tabbo मानल्या जाणाऱ्या अनेक विषयांपैकी एक विषय घेऊन त्यावर मराठीत सिनेमा बनवण्याचं धाडस करण्यासाठी निर्मात्यांचं खास कौतुक करायला हवं! चित्रपटाची कथा सुरू होते ती, कोकणातल्या एका गावात! शैला ( Rajshri Deshpande ) जी अनेक वर्षांनी आपल्या गावी परतते, ती थेट ‘शैलश’ बनून! तिचं हे बदललेलं रूप तिच्या कुटूंबाला व संपूर्ण गावालाच थक्क करतं. तिचं बालपण, मनाची अवस्थता, कुटुंबात होणारी भावनिक उलथापालथ आणि या सगळ्यातून स्वतःची ओळख शोधण्याचा व ते अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष म्हणजे ‘बाप्या’! ‘बाप्या’ हा केवळ एका ‘स्त्री’तील पुरूषाच्या अस्तित्वाचा प्रवास नाही, तर तो समाजातल्या बदलांचा देखील प्रवास आहे. कोकणासारख्या गावात ‘Trans-Men’ सारख...

ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘चुपके चुपके’या सिनेमाचे शूटिंग ‘जलसा’ या बंगल्यात झाले होते!

ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘ चुपके चुपके ‘ या सिनेमाचे शूटिंग ‘जलसा’ या बंगल्यात झाले होते! ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ (१९७५) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात  निखळ आनंद देणारा कौटुंबिक विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. उपेन्द्रनाथ गांगुली यांच्या ‘छद्मवेशी’ या बंगाली कथेवर आधारित हा चित्रपट आजही तितकाच ताजातवाना वाटतो. चित्रपटाची कथा अतिशय साधी पण खुसखुशीत आहे. वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक परिमल त्रिपाठी (धर्मेंद्र) यांचे लग्न सुलेखाशी (शर्मिला टागोर) होते. सुलेखा तिचे ‘जीजाजी’ राघवेंद्र शर्मा (ओम प्रकाश) यांच्या बुद्धिमत्तेची आणि आदर्शवादाची सतत स्तुती करत असते. हे पाहून परिमलला एक खोडसाळ कल्पना सुचते. जीजाजींना ‘मूर्ख’ बनवण्यासाठी परिमल त्यांच्या घरी ‘प्यारेलाल’ नावाचा ड्रायव्हर बनून जातो जो शुद्ध हिंदी बोलतो. यातून निर्माण होणारे गैरसमज आणि विनोदी प्रसंग म्हणजे हा चित्रपट. ऋषिकेश मुखर्जी यांना ‘मध्यममार्गी  सिनेमाचे सम्राट’ म्हटले जाते. ‘चुपके चुपके’ मध्ये त्यांनी कुठेही बटबटीत विनोद किंवा अश्लीलतेचा आधार घेतलेला नाही. चित्रपटाचा वेग मध्यम असून संवादफेकीवर ...

पांडू हवालदार : राज्य चित्रपट महोत्सवात २१ पैकी पाच पुरस्कार….

  वर्षे कशी नि कधी भरभर पुढे सरकताहेत बघा, दादा कोंडके यांच्या ‘ पांडू हवालदार ‘ या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास चक्क ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई शहरात हा चित्रपट ९ मे १९७५ रोजी गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह, दादर येथील कोहिनूर चित्रपटगृह आणि इतरत्र प्रदर्शित झाला आणि‌ पहिल्याच खेळापासून चित्रपट सुपर डुपर हिट‌ ठरला तो कायमचाच. प्रत्येक चित्रपटाच्या नावाला आपलं एक व्यक्तीमत्व असते. ते नाव घेताच अथवा आठवताना तो चित्रपट डोळ्यासमोर यायला हवा. ‘ पांडू हवालदार ‘ असाच एक चित्रपट आहे. दादा कोंडके यांनी आपल्या विशिष्ट शैलीत खुलवलेले त्या काळातील पोलिसांच्या आयुष्याचे दर्शन आहे.‌ आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियात अशोक सराफ यांची अनेक पाॅडकास्टवर घेतली जात असलेल्या जवळपास प्रत्येक मुलाखतीत ‘ पांडू हवालदार ” या चित्रपटावर त्यांना हमखास प्रश्न विचारला जातोय. ( अशोक सराफ म्हणजे बरंच काही, अक्षरशः बरेच काही आहे. ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाबाबत बरेच काही सांगता येईल. त्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १९७५ साठीच्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात एकूण २१ पुरस्कारात या चित्रपट...

श्रीवर्धन ते Cannes Film Festival… मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ची आंतरराष्ट्रीय झेप !

  मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा आणि तितकाच भावनिक क्षण घेऊन एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाची प्रतिष्ठित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागासाठी निवड झाली आहे. एका साध्या, मनाला भिडणाऱ्या कथेनं थेट जागतिक व्यासपीठ गाठलं आहे, हेच या यशाचं खास वैशिष्ट्य आहे. ‘एप्रिल मे ९९’ हा फक्त चित्रपट म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी जगलेला काळ आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मित्रांसोबतचे निखळ क्षण, पहिल्यांदाच मनात डोकावलेली ती कोवळी भावना… सगळंच या कथेत हळुवारपणे उमटलं आहे. हा चित्रपट पाहाताना प्रेक्षक फक्त कथा बघत नाहीत, तर स्वतःच्या आठवणींमध्ये हरवून जातात. म्हणूनच ही कथा कुठल्याही भाषेच्या चौकटीत न अडकता, थेट मनाशी संवाद साधते. या यशाबद्दल रोहन मापुस्कर म्हणतात, ” ‘एप्रिल मे ९९’ माझ्यासाठी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या त्या साध्या तरीही खूप खास क्षणांची गोष्ट आहे. आपण मोठे होताना नकळत मागे सोडून आलेल्या आठवणी – मित्रांसोबतचे दिवस, पहिलं प्रेम, आणि काही न बोलताही खूप काही सांगणारे क्षण हे सगळ...

Slumdog Millionaire या ऑस्कर विजेत्या सिनेमातील गंभीर चूक!

  30 ऑगस्ट 2008 रोजी प्रदर्शित झालेला ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट ऑस्कर साठी निवडला गेला होता.  या चित्रपटाला अनेक पारितोषिके मिळाले. ही एक ब्रिटिश ड्रामा फिल्म होती आणि दिग्दर्शन   Danny Boyle ,यांनी केले होते. भारतीय लेखक विकास स्वरूप यांच्या Q and A या 2005 साली लिहिलेल्या पुस्तकावर या सिनेमाचे कथानक होते. हा चित्रपट मुंबईतील एका झोपडपट्टीतील एका मुलाचा जमाल मलिकचा  (देव पटेल)  ‘कौन  बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील विजेता होई पर्यंतचा प्रवास दाखवला होता.   या चित्रपटात ‘कौन बनेगा करोडपती’ या सिनेमाचे कार्यक्रमाचे अँकरिंग अमिताभ बच्चन यांनी न  करता अनिल कपूर यांनी केले होते.  या कार्यक्रमात जमाल मलिक जे प्रश्न विचारले जातात गेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जमाल अचूक पणे देतो आणि विजेता बनतो! प्रेक्षक देखील एक स्लम एरियातील मुलाचा विजेते पदा पर्यंतचा प्रवास बघून खूष होतात. पण या प्रश्नांमध्ये एक बेसिक चूक झाली होती. यात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर चुकीचे असून बरोबर सांगितले गेले होते.  खर तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  चित...

Riteish Deshmukh : “महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही”

  एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील १०० कोटींचा पहिला वहिला ‘राजा शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित लवकरच होणार आहे… तर दुसरीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ३८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या मराठी पुस्तकाच्या शीर्षकावरून हा वाद निर्माण झाला असून आता यावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख याने तीव्र संताप सोशल मिडियावरुन व्यक्त केला आहे. रितेश देशमुखने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.’ असं रितेशनं पुढे म्हटलं आहे. तसेच, माध्यमांशी संवाद साधताना रितेश असं देखील म्हणाला होता की, ‘मी काही थेट ऐकलेलं नाही, मला ते...