Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास
मराठी सिनेमा हा कायमच नवनवीन, धाडसी विषयांना हात घालण्यासाठी ओळखला जातो. याच कडीत दिग्दर्शक समीर तिवारी यांचा Baapya Movie एक अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची, संघर्षाची नाही, तर त्यापलीकडे जाऊन समाज, कुटुंब व मानवी नात्यांच्या मानसिकतेचीही परीक्षा घेणारी आहे. समाजात Tabbo मानल्या जाणाऱ्या अनेक विषयांपैकी एक विषय घेऊन त्यावर मराठीत सिनेमा बनवण्याचं धाडस करण्यासाठी निर्मात्यांचं खास कौतुक करायला हवं! चित्रपटाची कथा सुरू होते ती, कोकणातल्या एका गावात! शैला ( Rajshri Deshpande ) जी अनेक वर्षांनी आपल्या गावी परतते, ती थेट ‘शैलश’ बनून! तिचं हे बदललेलं रूप तिच्या कुटूंबाला व संपूर्ण गावालाच थक्क करतं. तिचं बालपण, मनाची अवस्थता, कुटुंबात होणारी भावनिक उलथापालथ आणि या सगळ्यातून स्वतःची ओळख शोधण्याचा व ते अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष म्हणजे ‘बाप्या’! ‘बाप्या’ हा केवळ एका ‘स्त्री’तील पुरूषाच्या अस्तित्वाचा प्रवास नाही, तर तो समाजातल्या बदलांचा देखील प्रवास आहे. कोकणासारख्या गावात ‘Trans-Men’ सारख...