Posts

Padosan: The Song Mehmood Rejected Became a Timeless Bollywood Classic

  Some of Bollywood’s greatest songs have fascinating stories behind their creation, and “Mere Samne Wali Khidki Mein” from the 1968 comedy classic Padosan is one of them. Today, the song is considered one of the most loved romantic-comedy tracks in Hindi cinema, but surprisingly, producer and actor Mehmood initially disliked it. Padosan , starring Sunil Dutt, Saira Banu, Mehmood, and Kishore Kumar, remains one of Bollywood’s most iconic comedy films. During the music sessions, lyricist Rajendra Krishan and music director R.D. Burman worked on a light-hearted song for a key romantic sequence. Burman composed the tune in Raag Bhairavi and created a demo version that he believed perfectly suited the film. However, when Mehmood heard the composition, he was unconvinced. He felt the tune sounded too simple for such an important moment in the movie and instructed the team not to record it until further changes were made. Disappointed by the reaction, R.D. Burman reportedly crumpled up ...

50 years of Tumcha Aamcha Jamla: म्हणून लोकांना ‘दादा’ आवडायचे !

  Dada Kondke यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय तोच पहिल्या शोपासूनच पब्लिककडून त्या चित्रपटाचे उत्स्फूर्त अशा टाळ्या-शिट्ट्यांनी जोरदार स्वागत हे ठरलेलेच. याला स्टारडम (लोकप्रियता) म्हणतात. थिएटरबाहेरचे ब्लॅकमार्केटवालेही (तिकिटाचा काळाबाजार करणारे) Dada कोंडके यांचे पिक्चर कधी येतोय आणि आपल्या धंद्याला बरकत कधी येतेय याची वाट पाहत. असाच त्यांचा त्यांनी दिग्दर्शित केलेला धमाल चित्रपट ‘तुमचं आमचं जमलं’. हा चित्रपट २९ एप्रिल १९७६ रोजी सेन्सॉर संमत झाला आणि लगोलग पुणे शहरात ८ मे १९७६ रोजी सर्वप्रथम अलका टॉकीजमध्ये प्रदर्शित झाला आणि मग टप्प्याटप्प्याने अन्य शहरांमध्ये प्रदर्शित होत गेला आणि सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत यश प्राप्त केले. मुंबईत हा चित्रपट २६ जून रोजी कोहिनूर आणि अन्य चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाची कथा Datta Keshav यांची असून पटकथा आणि संवाद Rajesh Mujumdar यांचे आहेत. या चित्रपटात Dada Kondke यांची नायिका Anjana Mumtaz आहे आणि जोडीला Ashok Saraf ची धमाल भूमिका आहे. पांडू हवालदार (१९७५) च्या खणखणीत यशानंत...

Rajesh Khanna : राजेश खन्नाचा ‘चलता पूर्जा’ नावाचा चित्रपट माहितेय का ?

सर्वसाधारण अलिखित नियम काय आहे? काळ कृष्ण धवल अर्थात Black & White चित्रपटाचा असो अथवा कलरफुल सिनेमाचा असो, कोणत्याही कलाकाराचे (आज ज्यांना सेलिब्रिटीज म्हटले जाते) सुपर डुपर हिट चित्रपट जास्त माहित असतात. काळ बदलला, पुढे सरकला, माध्यमे बदलली, तरीही त्या यशस्वी चित्रपटांना फॉलो केले जाते. जे भारी सिनेमाप्रेमी आहेत (ज्यांना ‘सिनेमातले कीडे’ म्हटले जाते), ते न चाललेल्या, साफ पडलेल्या, रसिकांनी नाकारलेल्या अशाही चित्रपटांची नावे सांगू शकतात. एखाद्या कलाकाराचे दिवाने तर त्या कलाकाराचे मुहूर्ताला म्हणा किंवा चार-सहा रिळांचे चित्रीकरण झाल्यावर म्हणा, कायमचे डब्यात गेलेल्या चित्रपटाबाबतही बोलू, सांगू, ऐकू शकतात. चित्रपट इतिहासात डोकावताना हे असेही अनेक फंडे आहेत आणि चित्रपट अभ्यासात हेदेखील यायला हवे. Rajesh Khanna यांचेही असेच अनेक पडद्यावर येताच फर्स्ट शो सुटताच फ्लॉप झालेले, जेमतेम पडद्यावर येऊन प्रदर्शित झाल्याची नोंद असलेले, मात्र अपयशी ठरलेले, अधेमधे बंद पडलेले पिक्चर अनेक. त्यात किती वेळ, पैसा, शक्ती खर्च होत असते याची मोजदाद नाही. चित्रपटाच्या जगात खरं तर काहीच मोजायचे नसते. ते स...

Aamir Khan-Kitu Gidwani : आमीर खान, किट्टू गिडवाणी आणि त्यांचा विसरलेला लिप-लॉक किस!

  हिंदी सिनेमाच्या इतिहासात चुंबनाची परंपरा खूप जुनी आहे. मूकपटांच्या काळातही काही चित्रपटांत चुंबन दृश्ये होती. बोलपटांच्या सुरुवातीला, म्हणजे ३० च्या दशकात Devika Rani यांचे Karma (१९३३) या चित्रपटातील Himanshu Rai यांच्यासोबतचे प्रदीर्घ चुंबन दृश्य अनेक वर्षे चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर चित्रपट सेन्सॉर बोर्डाने अशा दृश्यांवर कडक निर्बंध आणले. परिणामी, दिग्दर्शकांनी सर्जनशील मार्ग शोधले—बागेतील दोन फुले एकमेकांना स्पर्श करताना दाखवून चुंबन सूचित करण्याची पद्धत रूढ झाली. ६० च्या दशकात Johar Mehmood in Goa या चित्रपटाने हे निर्बंध धाब्यावर बसवले. I. S. Johar आणि Sonia Sahni यांच्यातील ते दृश्य भारतातील पहिले सेन्सॉर संमत अधिकृत चुंबन दृश्य मानले जाते. काळानुरूप समाजात मोकळेपणा आला आणि सेन्सॉर बोर्डाची दृष्टीही बदलली. २१ व्या शतकात Emraan Hashmi च्या आगमनानंतर तर अशा दृश्यांचा जणू पाऊस पडला आणि आज ओटीटीच्या जमान्यात तर याचे कुणाला नवल वाटेनासे झाले आहे. पण एकेकाळी हे सर्व एक मोठे टॅबू (सामाजिक बंधन) होते. अशा या काळात, ८० च्या दशकात Aamir Khan ने एका चित्रप...

Kalakruti Special : शाळा, काॅलेज आणि चित्रपट

चित्रपट माध्यम आणि व्यवसाय यांचा जनसामान्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींशी, जवळपास सर्वच सण संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, वाढदिवस घटक, लग्न संस्कृती यांच्याशी संबंध आहे. तसाच तो शाळा कॉलेज यांच्याशीही आहे. चित्रपटाच्या नावात ‘शाळा’ (मराठी), ‘स्टुडंट्स ऑफ द इयर’ (हिंदी) यापासून त्याची सुरुवात होते. खरं तर हा बहुस्तरीय, बहुढंगी, बहुरंगी विषय. त्यातही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील शिक्षणाचे धडे वेगळे आणि ‘इम्तिहान’ (Vinod Khanna आणि Tanuja) या चित्रपटातील गोष्ट वेगळी. आणखी एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, साठच्या दशकात विशेष: दक्षिण मुंबईत जन्माला आलेल्या माझ्या पिढीला प्राथमिक शाळेत असताना अनेकदा तरी रविवार सकाळ कधी येतेय असं व्हायचं. (दूरचित्रवाणी येण्यापूर्वीचा हा काळ. मध्यमवर्गीय सरळमार्गी जीवन) याचं कारण, रविवारी सकाळी नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेकदा तरी बालचित्रपटाचे खेळ असत आणि त्या वयात तसे चित्रपट पाहण्यात एक विशेष आनंद मिळे. ती मानसिक गरज असे. मला आठवतंय, आमच्या गिरगावातील मॅजेस्टीक, सेंट्रल, रॉक्सी या चित्रपटगृहात असा रविवार सकाळचा एक शो असे. कधी फक्त आम्हा शालेय विद...

Vyjayanthimala : यशाची हॅटट्रिक तरी वैजयंतीमालाने चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत केले….

आपण ऐन भरात असताना थांबण्याचा निर्णय घेणं चित्रपटाच्या जगात जवळपास अशक्यप्राय गोष्ट. चित्रपटसृष्टीत आपण वरच्या स्थानावर आहोत, पैशाची बॅग घेऊन बडे बडे निर्माते साईन करायला तत्पर आहेत, दिग्दर्शक पटकथा घेऊन सेटवर निघालेत, वितरक चढ्या किमतीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क घ्यायला तयार आहेत, फिल्म दीवाने आगाऊ तिकीट विक्रीसाठी लांबलचक रांगेत उभे राहून तिकीट काढण्यासाठी धडपडताहेत, फिल्म मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आकर्षक देखणी छबी झळकतेय, गाॅसिप्स मॅगझिनमधून असलेलं नसलेलं लफडे शिजवले जातेय, असं सगळं हवंहवंसं वाटतं असलेलं असूनही चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत करावं? येड लागले की काय? वैजयंतीमालाने ते केलं. आणि आपल्या या ठाम निर्णयापासून अजिबात फिरकत घेतली नाही. कमालीचा संयम ठेवला. H. S. Rawail दिग्दर्शित Sangharsh (१९६८) हा Dilip Kumar सोबतचा चित्रपट‌ साधारण यशस्वी ठरला, पण Rajaram आणि Satish Wagle निर्मित आणि Bhappi Sonie दिग्दर्शित Pyar Hi Pyar (१९६९) हा Dharmendra सोबतचा, F. C. Mehra निर्मित आणि Lekh Tandon दिग्दर्शित Prince (१९६९) हा Shammi Kapoor सोबतचा चित्रपट आणि Naresh Kumar ...

Naushad And Rafi: सुहानी रात ढल चुकी… एक अजरामर स्वर-प्रवास

भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा दोन नावांचा उल्लेख सुवर्ण अक्षरांनी करावा लागेल—संगीत मार्तंड Naushad Ali आणि स्वरसम्राट Mohammed Rafi. शास्त्रीय संगीताचा पाया, लोकसंगीताचा गोडवा आणि सिने-संगीताची गेयता यांचा सुरेख संगम घडवून आणणारे नौशाद आणि आपल्या स्वरांनी अवघ्या जगाला मोहिनी घालणारे रफी, ही जोडी म्हणजे भारतीय संगीताला लाभलेले एक लेणे आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे, या गुरु-शिष्यांचे जन्मदिनांकही एकापाठोपाठ येतात. २४ डिसेंबरला रफींचा वाढदिवस, तर २५ डिसेंबरला नौशाद साहेबांचा. निसर्गाची ही योजना जणू या दोन महान आत्म्यांनी एकत्र येऊन संगीताची सेवा करावी, यासाठीच होती. मोहम्मद रफी यांनी चित्रपट सृष्टीत पहिले गाणे संगीतकार Shyam Sundar यांच्याकडे गायले असले, तरी त्यांना खऱ्या अर्थाने पैलू पाडण्याचे काम नौशाद यांनी केले. १९४४ सालच्या Pehle Aap या चित्रपटात नौशाद यांनी रफींना प्रथम संधी दिली. यातील ‘हिंदोस्ताँ के हम हैं हिंदोस्ताँ हमारा’ या गाण्याचा किस्सा आजही तितकाच रंजक वाटतो. नौशाद यांना या गाण्यात केवळ आवाज नको होता, तर तो जोष आणि लष्क...