Posts

थांबणं Arijit Singh याचं

  वीस एकवीस वर्षांची कारकीर्द आणि वय वर्षे अडतीस. इतकेच नव्हे तर, आजही लोकप्रिय आहे, फाॅर्मात आहे, फॉलोअर्स आहेत, मागणीही आहे आणि तरीही अरिजीत सिंगने आपण आता थांबत आहोत असे एक पोस्ट करत सोशल मीडियातून सांगावं हे वेगळे निश्चित आहे.‌ आजच्या ग्लोबल युगातील ती एक गरज आहे का?‌ त्याच्यापासून सांस्कृतिक क्षेत्रातील काहींनी प्रेरणा घ्यावी का की हे एक अपवादात्मक उदाहरण ठरावे? अरिजित सिंगने हिंदी, मराठीसह बंगाली, तमिळ इत्यादी भाषांमध्ये मिळून तीनशेहून जास्त गाणी गायली आहेत. त्यातील बरीचशी लोकप्रिय आहेत म्हणून तर तो इतकी वर्षे वाटचाल करु शकला. आज स्वतंत्र संग्रहासाठीचे ( अल्बम) गायन आणि पार्श्वगायन यांसह देश विदेशातील अनेक लहान मोठ्या कॉन्सर्टमध्ये गायचे असते, त्यासह भरपूर पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळते. त्यातून प्रशस्त घर, नवीनमॉडेलची चकाचक गाडी, खंडाळा अथवा अलिबागला सेकंड होम, वर्षभरातून एक विदेश दौरा हे सगळे मिळत जाते अथवा ते हवं म्हणून ‘नॉन स्टॉपन’ काम. यातून शारीरिक आणि मानसिक भावनिक दमछाक. एखाद्याचा हे सगळे मिळवण्यासाठीचा वेग फार फार तर एखाद्याला यासाठीची गती पकडता येत नाही म्हणून चि...

Bollywood Movie Trailer : गल्ली चित्रपट ते मल्टीप्लेक्स

अनुराग सिंग दिग्दर्शित  ‘बॉर्डर २’  सोबत आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ चा टीझर दाखवणार ही चक्क सोशल मीडियात बातमी झाली आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या अक्राळविक्राळ क्रेझने त्याचा टीझरदेखिल पाहावासा वाटतोय हे सांगायला कोणत्याही फिल्मी ज्योतिषाची गरज नाही. आज मल्टीप्लेक्स असो, डिजिटल प्लॅटफॉर्म असो, नवीन मराठी व हिंदी चित्रपटांचे केवढे तरी टीझर आणि ट्रेलर पाहायला मिळत आहेत. एका चित्रपटाच्या दरात केवढे तरी टीझर आणि ट्रेलर फुकट असा हा मामला आहे. मल्टीप्लेक्सला मात्र त्यात घसघशीत कमाई होते. हे टीझर, ट्रेलर चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा एक महत्त्वाचा भाग. कधी कधी इतका आणि असा अतिरेक होतो की, एकाच चित्रपटाचे चार पाच ट्रेलर असतात (चित्रपटसृष्टीच्या भाषेत कापले जातात) आणि त्यातून जवळपास सगळाच चित्रपट समजतो. बरं,त्याच चित्रपटातील गाणीदेखिल यू ट्यूबवर पाहायला मिळतात. इव्हेंटसमध्येही त्याच गाण्यांवर नाचकाम. एवढे सगळे दिसल्यावर फक्त आणि फक्त श्रेयनामावली आणि शेवट (क्लायमॅक्स) पाहायला ऑनलाईन तिकीट काढून मल्टीप्लेक्सला समोसा पॉपकॉर्न आणि शीतपेये यांचा आस्वाद घेण्यासाठी जायचे काय? चित्र...

Dhurandhar : पिक्चर पन्नास दिवस चालला तर केवढे कौतुक

  रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) कायमच चर्चेत असताना त्यात एक फंडा कायम असतो, ‘श़ोले’ थिएटरमध्ये चक्क पाच वर्षे मुक्काम ठेवून होता…. आणि आजच्या एसएमएस अथवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपलं म्हणणं व्हॉट्सअॅपवर मांडणं अथवा दुसऱ्याचं म्हणणं ऐकणं अशा आजच्या डिजिटल पिढीला त्यात आश्चर्य वाटते. पन्नास वर्षांपूर्वी चित्रपट पाहण्यासाठी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स हाच एकमेव मार्ग असल्याने पिक्चर सुपरहिट झाला रे झाला रौप्य महोत्सवी पंचवीस आठवड्याचा खणखणीत मुक्काम निश्चित. राजेश खन्नाचा नवीन चित्रपट पडद्यावर आला रे आला की समजावे तो सिल्व्हर ज्युबिली हमखास साजरी करणार असे ओळीने सतरा चित्रपट झाले. त्या काळात काठावर पसंत केला गेलेला चित्रपटही पंधराव्या आठवड्यापर्यत म्हणजेच शंभर दिवसांपर्यंत मजल मारत असे. शशी कपूर, राजेश खन्ना‌ आणि मुमताज  यांच्या प्रेम त्रिकोणाची सुपरहिट संगीत असलेल्या राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ (१९७५) या चित्रपटाने ड्रीमलॅन्ड चित्रपटगृहात असाच मुक्काम केला. अगदी प्रेक्षकांकडून नापास झालेला चित्रपट म्हणून ओळखला जाणारा मोहन सैगल दिग्दर्शित ‘वो मैं नहीं’ ...

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

  राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘मयसभा’ चित्रटाचे शेवटचे काही मिनिटं बघून तुमचे डोळे बंदच होणार नाही, तोंड उघडच राहील…  ‘तुंबाड’ नावाचा एक कल्ट क्लासिक सिनेमा देऊन भारतीय चित्रपटसृष्टीला हादरवणारा जादूगार राही अनिल बर्वे आता आपल्यासाठी घेऊन आला आहे ‘मयसभा: द हॉल ऑफ इल्यूजन’. महाभारतात पांडवांची एक मायासभा होती या सभेच्या जमिनी इतक्या चकचकीत होत्या की, समोर जमीन आहे की पाणी हे ओळखणं अशक्य व्हायचं . जिथे उघडं द्वार दिसायचं तिथे प्रत्यक्षात भिंत असायची, आणि जिथे भिंत वाटायची तिथून जाण्याचा मार्ग असायचा. ही पांडवांची मयसभा होती. पण राहीने निर्माण केलेली मयसभा तुमच्या पासून असं काही लपवून ठेवत नाही, पण तरीही तुम्हाला ते दिसत नाही… जो पर्यंत ते दाखवलं जात नाही. ही एखादी साधीसुधी कथा नाही आहे, हा एक ‘अनुभव’ आहे. एक जुनं पडीक थिएटर जिथे फक्त चारच पात्रं आहेत आणि फक्त एक रात्र आहे. पण ही चार पात्रं ९९ मिनिटं तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतात. मयसभा एक स्लो poison आहे जे हळुहळू तुमच्या मेंदूवर स्वार होतं. चित्रपटाचा प्लॉट म्हणजे परमेश्वर खन्ना बॉलीवुडचा जुना प्रोड्यूसर. ज्याचं ते जुनं पडीक थ...

Mayasabha Trailer Out: Jaaved Jaaferi Enters a Dark World of Illusion

After the cult success of Tumbbad , director Rahi Anil Barve is back to challenge the audience’s perception of reality with his new film Mayasabha – The Hall of Illusion . The much-awaited trailer is finally out—and it promises a psychologically intense, visually unsettling cinematic experience. One of the biggest highlights of Mayasabha is Jaaved Jaaferi playing a lead role for the first time in his four-decade-long career. Adding to the excitement, the female lead is not a Bollywood star but a talented Marathi actress, Veena Jamkar, making this collaboration even more special. The trailer hints at layered storytelling, strong performances, and a haunting narrative that blurs the line between illusion and truth. Produced by Zircon Films, the film also stars Mohammad Samad and Deepak Damle, and is set for a theatrical release on 30 January 2026. With Mayasabha , Rahi Anil Barve once again proves that he is here to unsettle, provoke, and mesmerise audiences. Curious to explore Jaaved J...

Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले होते?

  बॉलिवूडमध्ये ज्यांची ओळख ‘ट्रॅजेडी किंग’ अशी होते ते म्हणजे   दिलीप कूमार   (Dilip Kumar). हिंदी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अशा दिलीप साहाब यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. भारतात आपलं फिल्मी करिअर सुरु असूनही पाकिस्तानातही त्यांचा भल्ला मोठा फॅनबेस होता. पाकिस्तानातच जन्म झाल्यामुळे त्यांना १९९९ साली जेव्हा कारगिलमध्ये भारत-पाकिस्तानात युद्ध झालं होतं तेव्हा दोन्ही देशांमध्ये शांतता व्हावी यासाठी दिलीप कुमार यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. दिलीप कुमार यांचं पाकिस्तानाशी असलेलं एक खास नातं पाहून   बाळासाहेब ठाकरे   (Balasaheb Thackeray) प्रचंड संतापले होते आणि त्यांनी चक्क दिलीप साहाब यांनी पाकिस्तानातच राहावं असं म्हटलं होतं. नेमका काय किस्सा होता? जाणून घेऊयात. (Bollywood and Politics) तर, २०१५ मध्ये जेव्हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी भारत दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी कारगिल युद्धावेळी घडलेली ही घटना सांगितली… तर झालं असं होतं की, त्यावेळी तत्कालीन भारताचे पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी  यांनी कारगिल परिस्थितीवर चर्चा करण्यासाठ...

Rashmika & Vijay Devarkonda : २६ फेब्रुवारी, उदयपूर

  शीर्षकच इतकं आणि असं बरंच काही सांगतेय की, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथे  रश्मिका मंदाना   आणि   विजय देवरकोंडा   यांचा अतिशय भव्य दिव्य दिमाखदार पध्दतीने थाटात विवाह सोहळा पार पडणार आहे. बरं ही तारीख त्यांनी लग्नाचा एक चांगला मुहूर्त पाहून ठरवली आहे की, दोघांच्याही अतिशय बिझी शूटींग शेड्युल पाहून ठरवली आहे, हे त्यांचे त्यांनाच माहित. या सेलिब्रिटींना लग्न करण्याचा विचार करताना, तारीख ठरवताना फार फार कटकटी असतात हो.(Rashmika Mandanna &Vijay Devrkonda Marriage) मुमताजने लग्नाच्या बेडीत अडकताना हाती असलेले हरमेश मल्होत्रा दिग्दर्शित ‘लफंगे’ वगैरे चित्रपट पूर्ण करण्यासाठी निर्माता आणि दिग्दर्शकांना सांगितले. आणि नवीन चित्रपट स्वीकारायचा नाही असा निर्णय घेतला. तरी तिला आपला हुकमी हिरो  राजेश खन्ना च्या फार फार आग्रहास्तव राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ स्वीकारावा लागला. या चित्रपटाचा मुहूर्त होताना त्यात मौशमी चटर्जी प्रेमाचा तिसरा कोन होती. शशी कपूर दुसरा नायक होता. आपल्याला लकी असलेली  मुमताज  या चित्रपटात असेल तर ते अधिक उत्तम. त्या ...