Posts

Aditi Sarangdhar Joins New Marathi Serial “Sanai Choughade” on Zee Marathi

Image
The Marathi TV world is buzzing with new shows, and Zee Marathi is bringing another exciting serial titled Sanai Choughade . One of the biggest highlights of the show is the return of popular actress Aditi Sarangdhar , who will be seen in a powerful new role. After gaining popularity through several Star Pravah shows, Aditi is now stepping into Zee Marathi’s upcoming drama with a strong character named Tejaswini Khanolkar . According to the actress, the role is layered and emotionally intense. She shared that Tejaswini is a woman who has gone through many struggles in life, and those experiences deeply shape her personality. Interestingly, this serial marks a new milestone in Aditi’s career , as she will be playing a mother on television for the first time. Initially, she was hesitant about taking up a mother’s role, but the strength and depth of the character convinced her to say yes. Aditi has previously impressed audiences with roles like Rama Chaudhary in Vadalvaat , Saloni Deshm...

Bigg Boss Marathi 6: “मुXX, चल हट…” बिग बॉसच्या घरात जेवणाच्या मुद्द्यावरून राखी आणि सागर मध्ये तूफान राडा; नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता

  बिग बॉस मराठीचा सीझन ६  (Bigg Boss Marathi 6) प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करत आहे. घरात प्रत्येक आठवड्याचे ट्विस्ट आणि टास्क घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनवत आहेत. सध्या घरात दहाव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया सुरु आहे, आणि स्पर्धक दररोज नव्या-नव्या टास्कमध्ये आपापली ताकद सिद्ध करत आहेत. या आठवड्याच्या टास्कमध्ये कॅप्टन   संकेतला (Sanket Pathak)  बिग बॉसकडून विशेष पॉवर दिली गेली आहे, ज्यामुळे त्याला घरातील एका सदस्याला थेट नॉमिनेट करण्याचा अधिकार मिळाला आहे. कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरातील किचन एरियामध्ये   राखी सावंत   (Rakhi Sawant)   आणि सागर कारंडे (Sagar Karande) यांचा जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. वाइल्ड कार्ड एंट्री नंतर राखी घरातील जेवणाची ड्युटी सांभाळत आहे. प्रोमोमध्ये ती ओरडून सांगते, “आता मी जेवण बनवतेय.. त्यामुळे चहा बनवायचा नाही,” आणि तेवढ्यात सागर येतो आणि रागात म्हणतो, “उगाच ओरडू नको.” या छोट्या गोष्टीमुळे दोघांमध्ये राडा सुरू होतो. भांडण इतकं वाढतं की राखी रागात जेवणाचा टोप उचलून म्हणते, “मी सगळं जेवण टाकून...

Phula Marathi Movie Teaser: वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची भाष्य करणाऱ्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर लाँच!

  वाघ्या-मुरळी  परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या   “फुला” (Phula)  या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दमदार आवाजासाठी ओळखले जाणारे   सुबोध भावे   (Subodh Bhave) यांच्या निवेदनामुळे टीझरला एक वेगळीच उंची मिळाली आहे. येत्या १७ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आटपाडी येथील काही तरुणांनी एकत्र येऊन या वेगळ्या विषयाला पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची निर्मिती   पैलवान अजित शिवाजी जाधव  (Pailwan Ajit Shivaji Jadhav)यांनी केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांच्या माध्यमातून तो सादर केला जात आहे. कथालेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी   अभिषेक जावीर   यांनी सांभाळली आहे, तर पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांचे असून सर्जनशील   दिग्दर्शन अमर देवकर   यांनी केले आहे. गीतलेखनात रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांचा सहभाग आहे. छायांकन प्रताप जोशी या...

भाईजानने घेतला मोठा निर्णय;‘Battle of Galwan’ नाही तर आता ‘या’ नावाने रिलीज होणार सलमान चा मोस्ट अवेटेड चित्रपट!

  बॉलिवूड सुपरस्टार  सलमान खान  (Salman Khan) सध्या फक्त सिनेमातच नव्हे, तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही चर्चेत आहे. त्याच्या नवीन चित्रपटाबाबत चाहत्यांसाठी एक मोठा अपडेट समोर आला आहे. आधी ‘बॅटल ऑफ गलवान’ ( Battle of Galwan)  नावाने चर्चेत असलेला हा चित्रपट आता एका नव्या, जोरदार आणि अर्थपूर्ण टायटलसह प्रेक्षकांसमोर येणार आहे.आणि आता त्याच नाव  ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ( Matrubhumi: May War Rest in Peace)  हे आहे. या चित्रपटातील गाणे ‘मातृभूमी’ आधीच रिलीज झाले असून, प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले आहे. हे गाणे आणि त्याचा संदेश सिनेमाच्या संकल्पनेसाठी एक पायाभूत भूमिका बजावतो. सलमान खानने सिनेमाचे नाव बदलण्यामागील उद्देश फक्त ब्रँडिंगपुरता मर्यादित नाही, तर तो एक सामाजिक आणि जागतिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. ‘Battle of Galwan’ हा सिनेमाचा मूळ विषय  Galwan Valley clash  या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी शौर्य आणि बलिदानाचे अद्वितीय दर्शन घडवले. नवीन टायटल आणि टॅगलाइन  “May War Rest in...

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका; भारतीय चित्रपटसृष्टीत येत्या काळात बदल घडणार?

  २०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीने गाजवलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित  ‘छावा’  (Chhaava) चित्रपटाने २०२५ची जोरदार सुरुवात केली. ६०० कोटींचा टप्पा गाठत विकी कौशलच्या करिअरमधला हा बेस्ट चित्रपट ठरला. त्यानंतर ‘कांतारा २’, ‘रेड २’, ‘जॉली एल एल बी ३’ अशा हिंदी आणि साऊथ चित्रपटांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं… पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या प्रत्येक चित्रपटात चर्चा झाली ती नायकाची आणि दिग्दर्शकांची… वर उल्लेख केलेल्या एकाही चित्रपटाचं दिग्दर्शन फिमेल डिरेक्टरने केलं नव्हतं… पण २०२६ हे वर्ष वेगळं ठरणार आहे… जानेवारीत राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असणारा  ‘मर्दानी ३’  (Mardaani 3) आधीच रिलीज होऊन त्याने फिमेलओरियेन्टेड चित्रपटांची सुरुवात केली आहेच आणि आता ४ पुरुष दिग्दर्शकांच्या बिग बजेट चित्रपटांसमोर एक फिमेल डिरेक्टर उभी ठाकणार आहे. २०२६ आणि २०२७ या वर्षात हिंदी आणि साऊथमधील सुपस्टार कलाकारांचे बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. यात आदित्य धर दिग्दर्शित  ‘धुरंधर २’  (Dhurandhar 2), नितेश तिवारी दिग्दर्शित  ‘रामायण’  (Ramayana), संदीप र...

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला घरखर्च; कोरलंय ६ राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव!

  सिनेमा बनवायचा तर तो लार्जर दॅन लाईफचं हा मंत्र कायम पुर्ण करणारे दिग्दर्शक म्हणजे   संजय लीला भन्साळी … आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती जरी त्यांच्या नावे असली तर स्ट्रगलींग पीरीऐडमध्ये त्यांनी साड्यांना फॉल लावून घरखर्छ भागवलाय… इतकंच नाही तर चाळीत राहून आपलं आय़ुष्य त्यांनी घडवलंय… आज बॉलिवूडच्या या स्टार दिग्दर्शकाचा वाढदिवस… जाणून घेऊयात संजय लीला भन्साळी यांच्या जीवनबद्दल काही खास गोष्टी… संजय लीला भन्साळी म्हणजे इंडस्ट्रीतलं मोठं नावं… पण ते कमवण्यासाठी त्यांनी फार खस्ता खालल्या आहेत…आज यशाच्या शिखरावर असलेल्या संजय यांनी एकेकाळी अतिशय कठीण काळ पाहिलाय. त्यांचं बालपण, तारुण्यातील सुरुवातीचा काळ आणि सुरुवातीचं करिअर सोपं नव्हतं.  एका चाळीतील लहानशा घरात राहिलेल्या , शून्यातून सुरुवात केलेल्या भन्साळींनी आज त्यांच्या सिनेमांनी भारतासह जगभरात लोकप्रियता मिळवलीये. त्यांचा जन्म एका गुजराती जैन कुटुंबात झाला. २००२ मध्ये सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कुटुंबातील कठीण काळ सांगितला होता.  वडील सतत दारुच्या नशेत असायचे, ते दारुच्या आहारी गेल्य...

NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….

  आपल्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशातील चित्रपट संस्कृतीत अनेक लहान मोठे घटक समाविष्ट आहेत. आणि ती एक खूपच मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. आपल्या देशात वर्षभरात विविध भाषांतील जवळपास बाराशे तेराशे चित्रपट प्रदर्शित होतात या संख्याबळासह इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट, चित्रपट निर्मिती. त्यात आर्थिक नियोजन यशस्वीपणे करीत पडद्यावर चित्रपट आणण्यासाठी अतिशय फोकस्ड असलेल्या निर्मिती संस्था ते चित्रपट निर्मितीची केवळ हौस मौज असलेले, पण चित्रपट माध्यम आणि व्यवसाय याची जराही माहिती नसलेले अशी ही उतरंड आहे. कमी जास्त गुणवत्तेचे चित्रपट का बनतात याचे उत्तर त्यात आहे. त्यातच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ. अर्थात एन एफ डी सी.‌ ही भारत सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेली चित्रपट निर्मिती संस्था.१९७५ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली, त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातूनच वेगळ्या अशा मराठी आणि हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाले. (NFDC) सत्तरच्या दशकात एकीकडे मसालेदार मनोरंजक चित्रपटा...