Posts

‘Khoobsurat’: The Film That Changed Rekha’s Career Forever

  The 1980 classic film “Khoobsurat,” directed by legendary filmmaker Hrishikesh Mukherjee, remains one of the most loved films in Indian cinema. More than just an entertaining family drama, the movie played a major role in transforming actress Rekha’s image in Bollywood. Before “Khoobsurat,” Rekha was often seen mainly as a glamorous actress. However, her role as the cheerful and mischievous “Manju” changed everything. Wearing simple cotton sarees and two braids, Rekha impressed audiences with her natural acting, comic timing, and emotional depth. The film highlighted her talent in a completely new way and eventually earned her the first Filmfare Award of her career for Best Actress. The story revolved around a strict family led by Dina Pathak’s character, where discipline dominated daily life. Rekha’s energetic character entered the household and slowly filled it with happiness, laughter, and warmth. The film beautifully balanced humour with emotional moments while delivering an ...

V Shantaram : शांताराम बापूंच्या करड्या शिस्तीचा फटका जितेंद्र यांना दोनदा बसला होता !

चित्रपती V. Shantaram अतिशय शिस्तीचे भोक्ते होते. सिनेमा बनवताना सर्व गोष्टी अचूक आणि ठराविक वेळेत व्हायला पाहिजे यावर त्यांचा विशेष कटाक्ष असायचा. त्याना बेशिस्त अजिबात खपायची नाही. त्याचा फटका अभिनेता Jeetendra ला दोनदा बसला होता. 1962 साली त्यांच्या ‘Sehra’ या सिनेमाची निर्मिती चालू होती. जितेंद्र आणि Sandhya ही स्टार कास्ट फायनल झाली होती. जितेंद्र खूष होता त्याचा हीरो म्हणून पहिलाच सिनेमा असणार होता. सर्व शूटिंग राजस्थान ला होणार होते. बापूंची तिथे करडी शिस्त असायची. सर्व युनिट ने एकत्र जेवायचे, रात्री दहा नंतर रूम मधील लाइट ऑफ! जितेंद्र तरुण होता. एकदा तो संध्याकाळी शूट झाल्यावर लोकेशन पासून बाहेर पडून मौज मस्ती साठी शहरात गेला. रात्री त्याला उशीर झाला. रात्री भोजनासाठी जितेंद्र सोबत नाही हे बापूच्या लक्षात आले, आणि वॉचमनला बजावून ठेवले “जितेंद्र रात्री किती जरी उशिरा आला तरी त्याला माझ्याकडे पाठव . रात्री उशिरा Jeetendra हालत डुलत आला. वॉचमन च्या निरोपाने त्याची धुंदी क्षणार्धात उतरली. तो लगेच बापूच्या आदेशाने त्याना भेटायला गेला. बापू जागेच होते. त्यानी सर्वा समक्ष त्याला प्रच...

50 Years of Charas : अखेरच्या क्षणी सेन्सॉरने म्हटले, चित्रपटाचे नाव बदला !

विदेशात अनेक ठिकाणी चित्रीकरण झाले, चित्रपटात अनेक खलनायक असल्याने मारधाड वाढली, चित्रपटाचे एकूणच बजेट वाढवावे लागले, तेही केले आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे दिला आणि सेन्सॉरने पहिला सल्ला दिला, या चित्रपटाचं नाव बदला… यामागचे कारण काय, तर देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली असून चित्रपट सेन्सॉर करण्यासाठीचे नियमही बदलले आहेत. त्यात ‘CHARAS’ हे नाव चित्रपटाला अजिबात चालणार नाही. अजून आणीबाणी कायम आहे हे सेन्सॉरचे म्हणणं. अनुभवी निर्माता आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांना प्रश्न पडला, आता काय करायचं? मुहूर्तापासूनच या चित्रपटाचे नाव ‘चरस’ आहे.‌ तेव्हापासून चित्रपट पूर्ण होईपर्यंत अनेकदा त्याच्या दोन चार रिळाच्या चित्रीकरणानंतर सतत बातम्या येत राहिल्या.‌ आता चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत, चित्रपटाची अनेक शहरांतून पोस्टर्स, होर्डिंग्जही लागली आहेत, अशा वेळी ऐन वेळी नाव कसे बदलणार? ते करायचं तर खूपच मोठा खर्च आला. सेन्सॉरला हे म्हणणं पटलं आणि ‘चरस’ सेन्सॉर संमत होऊन २८ मे १९७६ रोजी चित्रपट दणक्यात प्रदर्शित झाला. त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत...

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या पहिल्या सिंहली (श्रीलंकन) भाषेतील गाण्याचा किस्सा!

  Lata Mangeshkar यांनी भारतातील जवळपास सर्व प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहे. लताच्या स्वरातील मधुरतेने त्या त्या भाषेतील शब्दांना सुरेल पण दिलं. आज इतक्या वर्षानंतर देखील ती सर्व गाणी रसिक आवडीने ऐकत असतात. लता दीदींनी केवळ भारतातील प्रादेशिक भाषांमध्येच नाही तर काही परदेशी भाषांमध्ये देखील गाणी गायली. आपले शेजारी राष्ट्र Sri Lanka या देशातील सिहली भाषेत लता दीदींनी गाणे गायले आहेत. या गीताला श्रीलंकेत राष्ट्रगीता इतकाच सन्मान मिळत असतो. सिंहली भाषेतील लता दीदींनीच्या पहिल्या गाण्याचा किस्सा खूप Interesting आहे. ( Lata Mangeshkar ) श्रीलंकेतील एक चित्रपट निर्माते T. Somasekaran यांनी आपल्या Seda Sulang चित्रपटात लताने गावे म्हणून ते खास भारतात मुंबईला लताला येऊन भेटले लता दीदींनी त्यांची विनंती मान्य केली आणि पहिल्या सिंहली भाषेतील लताच्या गाण्याचा जन्म झाला. लता त्या वेळी भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका होती. या गाण्याला संगीत Ananda Samarakoon या श्रीलंकन संगीतकाराने दिले होते. हे संगीतकार Gurudev Rabindranath Tagore यांचे शिष्य होते. संगीत आणि चित्रकला याची त्यांन...

Comedian Mehmood : यांनी अभिनेता सुंदरजींना त्याच्या वृध्दापकाळी अनमोल मदत केली होती !

सिनेमाची दुनिया ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी दुनिया आहे इथे मावळणाऱ्या सूर्याच्या मागे कोणी जात नाही. कलाकारांचे आयुष्य असेच असते. एकदा का तुमच्यावरील लाईम लाईट चा झोत गेला की तुम्हाला कुणी ओळखत नाही. आज ही परिस्थिती राहिली नाही कारण आज मीडिया आला आहे. माध्यमाच्या कुठल्यातरी प्लॅटफॉर्म वर तुम्हाला ओळख मिळत असते . पण तीस चाळीस वर्षा पूर्वी असला प्रकार नव्हता. त्या काळात असे अनेक कलाकार होते जे आपल्या सिनेमाची ओळख पुसून सर्व सामान्यप्रमाणे जीवन जगत होते. त्या काळात मीडिया आजच्या इतका प्रबळ नव्हता त्यामुळे या कलाकारांचे फोटो देखील लोकांना माहीत नसायचे. त्यामुळे अनेक कलाकार हे अंधारगर्तेत आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध जगत होते. त्यापैकीच एक होता हास्य कलाकार Sunder पन्नास आणि साठ च्या दशकात कॉमेडीयन सुंदर ने रसिकांची चांगली पसंती मिळविली होती. त्याने 1938 ते 1980 हा तब्बल चाळीस – पन्नास वर्षाचा कालखंड सिनेमांमध्ये घालवला. जवळपास चारशे हून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. पंजाबी सिनेमात तर नायक होते. Solva Saal, Mere Mehboob, Padosan, Apna Desh, Charas, Pratigya, Betaab, A...

Ismat Chughtai यांच्या वादग्रस्त कथेवरील ‘लिहाफ’ सिनेमा बघितला का?

स्त्रियांचे समलिंगी संबंध अर्थात लेस्बियन हा विषय आज देखील बोल्ड समजला जातो पण याच विषयावर 1940 साली लेखिका इस्मत चुगताई यांनी एक कथा लिहिली होती. लक्षात घ्या या बोल्ड कथेने नव्वद वर्षापूर्वीच्या त्या सनातनी वातावरणात काय वादळ निर्माण झाले असेल? तिच्यावर लाहोर कोर्टात खटला दाखल झाला. या सर्व प्रकारांवर मध्यंतरी Lihaaf हा सिनेमा येवून गेला पण गंमत म्हणजे त्यावर फारशी चर्चा झाली नाही. हा सिनेमा दुर्लक्षित राहिला की समाज मॅच्युअरड झाला ? पुरोगामी स्वतंत्र वैचारीक बाण्याच्या Ismat Chughtai यांची कला कारकीर्द भन्नाट होती! १९७४ सालच्या Garm Hava या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअरचा पुरस्कार देखील पटकावला होता. या चित्रपटाच्या लेखिका होत्या इस्मत चुगताई. आज हे नाव कुणाला आठवण्याची शक्यता नाही. Ismat Chughtai (२१ ऑगस्ट १९११ – २४ ऑक्टोबर १९९१) या एक भारतीय उर्दू कादंबरीकार, कथालेखिका, उदारमतवादी मानवतावादी आणि चित्रपट निर्मात्या होत्या. १९३० च्या दशकात आपल्या लेखनाची सुरुवात करताना, त्यांनी स्त्रीची लैंगिकता व स्त्रीत्व, मध्यमवर्गीय सुसंस्कृतपणा आणि वर्गसं...

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?

  अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ? अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा बॉलीवूड चे दोन महान कलाकार.  एक कमर्शियल सिनेमाचा शहेनशहा तर दुसरा आर्ट  फिल्म चा आयकॉनिक ऍक्टर. या दोन कलाकारांनी आजवर कधीच एकत्र काम केलेले नाही आणि भविष्यात एकत्र काम करण्याची सुतराम शक्यता नाही! या दोघांना घेऊन एखादा चित्रपट करावा असे कुणा निर्मात्याला ही कधी वाटले नाही. नासिर ने काही कमर्शियल सिनेमे नक्कीच केले. अमिताभ बच्चन यांनी देखील काही आर्ट फिल्म्स केल्या.  पण या दोघांचं करिअर समांतरच राहिले! अमिताभ बच्चन कधीच कोणत्याही कलाकारावर आपत्ती जनक टिप्पणी करत नाही.  अमिताभ नेहमीच एका स्टॅंडर्ड उंचीवर राहून लाईम लाईट मध्ये  वावरत असतो.   या उलट नसिरुद्दीन शहा ने एकदा एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि त्याच्या चित्रपटावर भरपूर टीका केली होती. या मुलाखतीत त्याने अमिताभ बच्चन काही महान कलाकार महान वगैरे कलाकार नाहीत  असे जाहीर पणे सांगितले होते .   तो केवळ स्टंट मन एक बिझनेसमन आहे आणि त्या पद्धतीने तो या व्यवसायात आलेला आहे असे  उदगार देखील क...