Posts

Manoj Bajpayee : “मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही”

Image
  चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende) हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात अभिनेते मनोज बाजपेयी प्रमुख भूमिका साकारणार आहेत… कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजला दोनदा जेरबंद करणाऱ्या मराठमोळ्या मधुकर झेंडे यांच्यावर चित्रपटाचं कथानक आधारित असून इन्स्पेक्टर झेंडेंनी मुंबईभर त्याला शोधण्याची मोहीम कशी राबवली होती हे यातून मांडण्यात आलं आहे… यात अभिनेता जिम सरभ (Jim Surbh) चार्ल्सच्या भूमिकेत असून मनोज वाजयेपी झेंडंची भूमिका साकारणार आहे… या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत मनोज यांनी मुंबई सोडण्याचा विचार मनात आल्याचं विधान केलं होतं.. नेमकं काय म्हणाले मनोज जाणून घेऊयात… Box office collection  मनोज बाजपेयी यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाविषयी म्हणाले की, “जेव्हा मला सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली तेव्हा वाटलं की एक गंभीर थ्रिलर फिल्म असेल. पोलिसांच्या संघर्षाची कथा असेल. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा फार मजा आली. मला सारखं हसू येत होतं. स्क्रिप्टमध्ये कॉमेडी बळजबरी घुसवली आहे असं कुठेच वाटलं नाही. यात अभिनय करताना क...

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर प्रेक्षकांची ‘ही’ आवडती मालिका घेणार लवकरच निरोप !

Image
  टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी सतत नवनवीन प्रयोग करत असते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काही नवीन मालिका झटपट सुरु होतात, तर काही आवडत्या मालिकांना अचानक पूर्णविराम मिळतो. स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडे दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जुन्या मालिकांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका संपणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.(Aai Ani Baba Retire Hot Aahet) Latest Marathi movies ही मालिका म्हणजे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. ही कौटुंबिक मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. परंतु आता सोशल मीडियावर मालिकेच्या लवकरच संपुष्टात येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ देखील संपणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षक निराश झाले आहेत. या मालिकेत किल्लेदार कुटुंब दाखवण्यात आलं होतं. घरचे प्रमुख यशवंत किल्लेदार हे निवृत्त झालेलं पात्र, त...

‘Bigg Boss’ शो ची कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून? कसा बनला भारताचा सर्वाधिक हिट शो?

Image
  भारतातील टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शोजची क्रेझ नेहमीच जबरदस्त राहिली आहे. पण जर सर्वाधिक लोकप्रिय शो कोणता असा प्रश्न विचारला, तर एकच नाव समोर येतं ते म्हणजे ‘बिग बॉस’. प्रेक्षक दरवर्षी याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की हा शो भारतात नेमका कधी सुरु झाला, त्याचं कॉन्सेप्ट कुठून आलं आणि यशाचं रहस्य नेमकं काय आहे? खरं तर, ‘बिग बॉस’ हा कुठलाही ओरिजनल भारतीय शो नाही. हा शो ब्रिटिश रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’ वर आधारित आहे. ‘बिग ब्रदर’ हा शो १९९७ मध्ये ब्रिटिश निर्माता जॉन डी मोल यांनी तयार केला होता. त्यामागचा उद्देश साधा होता की, लोकांना सेलिब्रिटींचं खरं जीवन, त्यांच्या नातेसंबंधातील चढउतार, वादविवाद आणि नाट्य थेट टीव्हीवर पाहता यावं. (Bigg Boss Reality Show) Bollywood Tadka  या शोची प्रेरणा जॉर्ज ऑरवेल यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘नाइन्टीन एटी-फोर’ मधून घेतली गेली होती. त्या पुस्तकात एका तानाशाही जगाची कल्पना मांडली आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीवर सतत नजर ठेवली जाते. ह्याच संकल्पनेतून ‘बिग ब्रदर’ शोचा जन्म झाला. सन २००० मध्ये ‘बिग ब्रदर’ प्रथम...

What Makes Marathi Webseries Stand Out in the OTT Crowd?

Image
  The OTT boom has transformed the way we consume entertainment. From global giants to regional platforms, the sheer variety of content is overwhelming. Yet, in this ocean of choices, Marathi webseries have carved out a special space for themselves. They’re not just surviving; they’re thriving—and it isn’t by accident. There’s a unique cultural and creative edge that makes them stand out. Let’s dive into what gives Marathi webseries their distinctive appeal. Authentic Storytelling with a Local Soul At the heart of every memorable webseries is its story. Marathi creators have leaned heavily into themes rooted in reality—family bonds, social issues, aspirations, and even political satire. This authenticity connects with audiences far beyond Maharashtra. For example, a 2023 FICCI report highlighted that regional content now accounts for over 30% of India’s OTT consumption , with Marathi playing a notable role in this rise. Strong Performances by Talented Actors Unlike the star-heavy a...

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman

Image
  संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं होतं. नुकतीच ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकारांची झलक समोर आली असून यात संत तुकारामांची भूमिका अभिनेते योगेश सोमण साकारणार आहेत… तर, त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे. Latest Marathi Movies मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर आणणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणतात की, ‘तुक...

Shah Ruk Khan : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात…”

Image
  बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि रोमॅंटिक अंदाजाने भूरळ पाडतोय… इतकी वर्ष काम केल्यानंतर अखेर शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे… या पुरस्काराबद्दल किंग खान याने मुलगा आर्यन खान याच्या आगामी त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ या पहिल्या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटवेळी प्रतिक्रिया दिली आहे… सध्या तो मुलगी सुहाना खान सोबत किंग चित्रपटाचं शुटींग करत असून यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली आहे… हाताला झालेली दुखापत आणि राष्ट्रीय पुरस्कारावर शाहरुखने त्याच्या खास शैलीत भाष्य केलं आहे…(Bollywood News) Box office collection शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ हा पहिल नेटफ्लिक्स शो लवकरच रिलीज होणार आहे…. नुकताच या शोचा प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंट संपन्न झाला… हाताला दुखापत झाली असूनही आपल्या मुलाच्या यशात सहभागी होण्यासाठी शाहरुख आणि गौरी खान (Gauri Khan) उपस्थित होते… यावेळी त्याने मिश्किलपणे दुखापतीबद्दल बोलताना ‘...

‘मराठी लोकांचे वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण…’; काय बोलून गेले Vivek Agnihotri

Image
  ‘द कश्मिर फाईल्स’, ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या चांगलेच चर्चेत आहेत… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे पती असणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी मराठी पदार्थांना गरीबांचं जेवन असं म्हटल्यावर लोकांचा रोश जितका विवेक यांच्यावर होता तितकाच पल्लवी यांनी ते विधान ऐकून कसं घेतलं यावरही होता.. नेमकं विवेक अग्निहोत्री काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… Box office collection तर, विवेक अग्निहोत्री यांनी कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत मराठी जेवणाबद्दल भाष्य केलं आहे. वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण असल्याचं त्यांनी म्हटलं हे. त्यांच्या या वक्तव्यावरुन लोकांचा रोष त्यांनी पत्करला आहे… मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहे. लग्नानंतर घरी मराठी पदार्थ बनू लागल्यानंतर विवेक यांची प्रतिक्रिया काय होती, या बाबत पल्लवी जोशींना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा पण मराठ...