Posts

अलबेला…. Govinda याचाही

  अलबेला असं म्हणताक्षणी चित्रपट रसिकांच्या एका पिढीच्या डोळ्यासमोर मा. भगवानदादा यांचे ‘ अलबेला ‘ रुपडे, १९५१ सालच्या या चित्रपटातील शोला जो भडके दिल मेरा धडके, धीरे से आजा रे, शाम ढले खिडकी तले, भोली सुरत दिल के खोटे, ये दीवाना ये अशी सर्वकालीन सुपरहिट गाणी आली असतीलच. या चित्रपटाला तब्बल पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत तरी ‘ अलबेला ‘ म्हटलं की हाच कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपट, त्यातील मा. भगवानदादा आणि गीता बाली यांची नृत्य अदा, राजेंद्र कृष्ण यांची गीते आणि सी. रामचंद्र अर्थात अण्णा चितळकर यांचे संगीत हेच प्रगती पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरते. या अलबेलाची गोष्ट एहसान रिझवी याची तर पटकथा आणि दिग्दर्शन भगवानदादा यांचे.   ‘अलबेला ‘ नावाचा हिंदी चित्रपट आतापर्यंत तीनदा पडद्यावर आला. मेहमूदचा ‘अलबेला’ (१९७१) कधी आला आणि कधी गेला हे समजलेच नाही हे आश्चर्य. मेहमूद अफाट प्रतिभेचा आणि विनोदाचे उत्तम टायमिंग असलेला अष्टपैलू कलाकार. पण दिग्दर्शक ए. समशेर यांना त्याच्या गुणाचा उपयोग करून घेता आला नाही. या चित्रपटात अरुणा इराणी मेहमूदची नायिका होती. याशिवाय आय. एस. जोहर,...

आता काय तर म्हणे, Sharvari Wagh ‘मधुबाला’ साकारणार…

  ‘मधुबाला’ सारखं दुसरं कोणी असू शकतो का? तर अजिबात नाही. मुळात कृष्ण‌ धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या युगात प्रत्येक अभिनेत्रीचे आपलं एक व्यक्तीमत्व, आपलं एक वैशिष्ट्य, आपली एक अभिनय शैली होती. नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, नूतन, कामिनी कौशल, नंदा तसेच वहिदा रेहमान, वैजयंतीमाला, माला सिन्हा, मुमताज… रंगीत चित्रपटाच्या युगातही या अभिनेत्री आपल्या त्याच वैशिष्ट्यांसह ओळखल्या जात. मधुबाला म्हटल्यावर एकाच वेळेस के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’ (१९६०) मधील अनारकली आणि सत्येन बोस दिग्दर्शित ‘चलती का नाम गाडी’ (१९५८) मधील खट्याळ रुपडे डोळ्यासमोर येतेच. कमाल अमरोही दिग्दर्शित महल ( १९४९), गुरुदत्त दिग्दर्शित मिस्टर ॲन्ड मिसेस (१९५६), कालीदास दिग्दर्शित हाफ तिकीट (१९६२),‌ पी. एल. संतोषी दिग्दर्शित ‘बरसात की रात’ (१९६०), मेहबूब खान दिग्दर्शित ‘अमर’ (१९५४). अशा अनेक चित्रपटांतील विविधरुपी मधुबाला चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरली , त्यात ‘मधुबाला’ ‘सौंदर्य’ आणि दर्जेदार अभिनय यांचे अतिशय उत्तम दर्शन घडते. या चित्रपटांना आज साठ पासष्ट वर्षे पूर्ण होऊनही ते पुन...

Mi Savitribai Jotirao Phule मालिकेत नवा टप्पा, नवी लढाई! डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांची एन्ट्री !

  मी सावित्रीबाई जोतीराव फुले  (Mi Savitribai Jotirao Phule) या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत असून, आता कथा एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत सावित्रीबाई आणि जोतीराव यांचं बालपण, त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे संघर्ष आणि शिक्षणासाठीची तळमळ प्रेक्षकांनी जवळून अनुभवली. आता ही कथा अधिक व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पुढे सरकणार आहे. समाजात रुजलेल्या जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत “शिक्षण हाच खरा मार्ग” हा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न मालिकेत ठळकपणे मांडला जाणार आहे. स्त्रिया आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई आणि जोतीराव यांनी घेतलेली धाडसी पावलं, त्यांना सहन करावा लागलेला विरोध आणि त्यामागची जिद्द आता अधिक प्रभावीपणे उलगडली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याला अधिक भक्कम बनवण्यासाठी मालिकेत दोन दमदार कलाकारांची एंट्री होत आहे.  मधुराणी गोखले प्रभुलकर  (Madhurani Gokhale Prabhulkar) आणि  डॉ.अमोल कोल्हे  (Amol Kolhe) हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकांमधू...

Dr. Babasaheb Ambedkar : जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला अप्रतिम चरित्रपट!

  आज 14 एप्रिल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. साऱ्या जगाला मानवतेचा समतेचा महान संदेश देणारे  विश्व रत्न महामानव डॉ बी आर आंबेडकर . त्यानी वंचितांना, शोषितांना आत्मविश्वास  देवून आत्मनिर्भरतेचा नारा दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक चित्रपट बनले. आभाळा एवढे महान कार्य करणाऱ्या या  क्रांतीकारी महापुरूषाचा जीवनालेख तीन तासात पडद्यावर मांडणे तसे अवघडच. 1998 साली डॉ जंब्बार पटेल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चित्रपट बनवला होता. हा सिनेमा आजवर त्यांच्या वर बनलेल्या सर्व चित्रपटात उजवा वाटतो. या सिनेमात डॉ. आंबेडकर यांची भूमिका दाक्षिणात्य कलावंत मामूटी यांनी साकारली होती. ही भूमिका त्यांना कशी मिळाली? डॉ पटेल यांनी सुरुवातीला जगभरात अशा अभिनेत्याचा शोध घेतला, जो आंबेडकरांच्या ‘बुद्धिमान, विद्वान’ व्यक्तिमत्त्वाशी जुळेल. या शोधात शेकडो अभिनेत्यांचा विचार करण्यात आला, ज्यात रॉबर्ट डी नीरो यांचाही समावेश होता. डी नीरो यांना यात रस होता, पण त्यांची निवड झाली नाही कारण , त्यांना डॉ जंब्बार यांना आंबेडकरांच्या भूमिकेतील हवा असलेला  विशिष्...

रंगीला चित्रपटातील ‘ते’ गाणं Asha Bhosle यांनी वादक नसतानाही गायलं होतं!

  भारतीय चित्रपट आणि संगीतसृष्टीतील अजरामर नाव म्हणजे पद्मविभूषण   Asha Bhosle … ज्येष्ठ गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकरांचे स्वरसंस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले आणि संगीत क्षेत्राला एक अशी गायिका मिळाली जिने कायम वर्सटाईल गाणी गाण्यास प्राधान्य दिलं… ज्या काळात आर.डी बर्मन, किशोर कुमार एका वेगळ्या शैलीत गाणी गात होते, त्याचवेळी आशाताईंनी त्यांच्या गाण्याची पद्धत आत्मसात करत आपली वेगळी स्टाईल निर्माण केली आणि वयाच्या नव्वदीतही ती कायमची जपली… वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचं असं अकाली निधन खरंच प्रत्येक संगीत प्रेमीला धक्का देणारं आहे.. आज त्यांच्या आठवणीत हिंदीतील एका अशा अजरामर गाण्याचा किस्सा जाणून घेऊयात जे गाणं   आशा भोसले यांनी वादकांशिवाय रेकॉर्ड केलं होतं… तर हा किस्सा आहे रामगोपाल वर्मा दिग्दर्शित Rangeela (१९९५) चित्रपट तयार होत असतानाचा… झालं असं की आशाताई चेन्नईला रंगीला चित्रपटातील एका गाण्याचा रेकॉर्डींगसाठी गेल्या होत्या… बंर चित्रपटाला संगीत दिलं होतं ग्रेट A.R.Rehman यांनी… तर, गाण्याच्या रेकॉर्डींसाठी त्या स्टुडिओत गेल्या असल्या असं लक्षात आलं की ...

अमरीश पुरी यांनी Smita Patil यांच्या कानाखाली का मारलं होतं?

  एकेकाळी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांसोबत एका मराठी अभिनेत्रीने स्क्रिन शेअर करत लोकांना वेड लावलं होतं… प्रत्येक भूमिकेत आपली अभिनयाची अविट छाप उमटवण्याचं कौशल्य त्या अभिनेत्रीत होतं… दुर्दैवाने फार लवकर तिने या जगाचा निरोप घेतला… जर का आज ती हयात असती तर श्रीदेवी, हेमा मालिनी यांच्या यादीत नक्कीच तिचं नाव असतं… आणि ती म्हणजे   Smita Patil … अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राज बब्बर यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत स्मिता यंनी काम करत त्यांच्या तोडीस तोड अभिनय केला होता.. आज आपण त्यांचा असा एक इंटरेस्टिंग किस्सा जाणून घेऊणार आहोत ज्यात बॉलिवूडचे ग्रेट खलनायक   Amrish Puri यांनी चक्क स्मिता यांच्या कानशिलात लगावली होती… काय होता तो किस्सा जाणून घेऊयात… बॉलिवूडमध्ये ८०-९०च्या दशकात जितका नायक लोकप्रिय होता तितकाच खलनायक देखील होता… अमरीश पुरी यांनी लीड रोल म्हणजे मेन हिरोची भूमिका कधीच केली नसली तरी त्यांनी साकारलेले खलनायक हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहेत.. स्मिता पाटील आणि अमरीश पुरी यांचा हा किस्सा 1977 मध्ये आलेल्या  Bhumika  या चित...

Gaurav More: “झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण…” फिल्टरपाड्याचा बच्चनसाठी अभिनेत्री Chhaya Kadam यांची खास पोस्ट!

  मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा  गौरव मोरे  (Gaurav More) सध्या आनंदाच्या दुहेरी कारणामुळे चर्चेत आला आहे.  महाराष्ट्राची हास्यजत्रा  (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव आता आपल्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी झेप घेताना दिसत आहे. मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्याने केवळ करिअरमध्येच नव्हे, तर आयुष्यातील मोठं स्वप्नही पूर्ण केलं आहे. ‘ फिल्टरपाड्याचा बच्चन ’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या गौरवने मुंबईत स्वतःचं आलिशान घर घेतलं आहे. विशेष म्हणजे, त्याच्या घराबाहेर लावलेली नेमप्लेटही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘ फिल्टरपाड्याचा बच्चन ’ असं नाव अभिमानाने मिरवत त्याने आपल्या संघर्षमय प्रवासाची आठवण जपली आहे. झोपडपट्टीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आज एका सुंदर घरापर्यंत पोहोचला, ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.  गौरवचा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत साध्या परिस्थितीतून तो पुढे आला. छोट्या छोट्या भूमिकांपासून सुरुवात करत, त्याने आपल्या विनोदी शैलीने आणि भन्नाट टाय...