Posts

Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?

Image
  ‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) चित्रपटापासून अजून एकही चित्रपट रणवीर सिंगचा आला नाही अशी चर्चा सिनेवर्तृळात ऐकू येत आहे… मात्र, लवकरच रणवीर सिंग (Ranveer Singh) एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय सादर करताना दिसणार आहे…आजवर, कॉमेडी, विलन अशा विविधांगी भूमिका साकारल्यानंतर रणवीर सिंग प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजू लवकरच दाखवणार आहे… (Bollywood News) Celebrity interviews रणवीर सिंग ‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटात हटके अंदाजात दिसणार असून सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं कथानक असणार आहे… विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट देखील आहे. तसेच, या चित्रपटानंतर रणवीर फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे…(Ranveer Singh movies) फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन २’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं… अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाची Legacy शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘डॉन २’ मध्ये जपली होती… आता डॉन ३ मध्ये शाहरुख ऐवजी रणवीर सिंग दिसणार अ...

Alka Kubal : ‘माहेरची साडी’ चित्रपट आधी ‘या’ हिंदीतील अभिनेत्रीला झालेला ऑफर!

Image
  मराठी चित्रपटसृष्टीत आजवर बरेच कल्ट चित्रपट येऊन गेले… मात्र, ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi movie) या चित्रपटाचा रेकॉर्ड कोणताच चित्रपट मोडू शकत नाही… बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही तर जितकं प्रेम आणि प्रतिसाद अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या माहेरची साडी चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला होता तितका आजवर कुठल्या चित्रपटाला मिळाला असेल यात जरा शंकाच आहे… प्रेक्षकांनी सगळ्याच मराठी चित्रपटांवर भरभरुन प्रेम केलं पण ‘माहेरची साडी’ हा जरा खास चित्रपट आहे हे निश्चितच… १८ सप्टेंबर १९९१ रोजी रिलीज झालेल्या विजय कोंडकेंच्या या चित्रपटाला आज ३४ वर्ष पूर्ण झाली… मराठीतील ऑल टाईम सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली होती… पण तुम्हाला माहित आहे का अलका कुबल नाही तर एक वेगळीच अभिनेत्री या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती होती?(Marathi cult classic movies) Box office collection ‘माहेरची साडी’ या चित्रपटात अलका कुबल (Alka Kubal) यांनी सोशिक सुनेची भूमिका साकारली होती… खरं तर या चित्रपटामुळे अलका यांना महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी विशेष प्र...

Soha Ali Khan आणि सैफ अली खान एकत्र का राहात नव्हते?

Image
  आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर (Sharmila Tagore0… त्यांची दोन मुलं सोहा अली खान आणि सैफ अली खान ही म्हणजे बॉलिवूडमधील आनंदी भाऊ-बहिणीची जोडी… सैफ अली खान पुर्णपणे चित्रपटांमध्ये आपलं करिअर करत होता आणि आजही करतोय… पण सोहा अली खान फार चित्रपटांमध्ये दिसली नाही… नुकताच ‘छोरी २’ (Chhori 2) चित्रपट तिने केला तितकाच.. मात्र, तुम्हाला माहित आहे का सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि सैफ अली खान एकत्र एका घरात राहात नव्हते… इतकंच काय तर तिच्या आणि करिनाच्या नात्याबद्दलही मोठा खुलासा समोर आला आहे… चला तर जाणून घेऊयात…(Bollywood news) Bollywood Masala सोहा अली खान हिने The Quint शी बोलताना भाऊ सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर खानसोबतच्या नात्यावर प्रकाश टाकला. सोहा म्हणाली की,  मी आणि सैफ फार कमी वेळा एकाच घरात होतो, कारण आमच्यात ९ वर्षांचा फरक असल्यामुळे जेव्हा मी जन्माला आले तेव्हा सैफ इंग्लंडमधल्या बोर्डिंग स्कूलला गेला होता…. आणि जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा मी माझ्या करिअरमध्ये बिझी होते… त्यामुळे आम्ही ...

‘काजळमाया’ या गूढ मालिकेतून अक्षय केळकरची स्टार प्रवाहवर एण्ट्री!

Image
  गेल्या पाच वर्षांपासून दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नेहमीच नवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि घरच्यांसारखी वाटणारी पात्रं देणं हे स्टार प्रवाहचं वैशिष्ट्य ठरलं आहे. हाच वारसा पुढे नेत आता वाहिनी प्रेक्षकांसमोर एक वेगळ्या धाटणीची गूढ मालिका घेऊन येत आहे ज्याच नाव आहे ‘काजळमाया‘. ही मालिका एका चेटकीण वंशाची कहाणी सांगते. विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत निपुण असलेली पर्णिका ही या मालिकेची केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा. तिला चिरतरुण्याचं वरदान लाभलेलं आहे. रुपाने मोहक असली तरी तिच्या मनात फक्त स्वार्थ, महत्वाकांक्षा आणि निर्दयता आहे. पर्णिकेचं एकमेव ध्येय म्हणजे स्वतःचं साम्राज्य उभारणं आणि चेटकीण वंशाचा विस्तार करणं. सगळ्यांना आपल्या पायाशी आणण्यासाठी ती कुठल्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. पण तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुष कडून आव्हान मिळतं, तेव्हा सुरू होते ‘काजळमाया‘ रहस्यमय आणि रोमांचकारी प्रवासाची कहाणी.(Actor Akshay Kelkar) Bollywood Tadka या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर मुख्य भूमिका स...

Manoj Bajpayee : “मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही”

Image
  चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende) हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात अभिनेते मनोज बाजपेयी प्रमुख भूमिका साकारणार आहेत… कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजला दोनदा जेरबंद करणाऱ्या मराठमोळ्या मधुकर झेंडे यांच्यावर चित्रपटाचं कथानक आधारित असून इन्स्पेक्टर झेंडेंनी मुंबईभर त्याला शोधण्याची मोहीम कशी राबवली होती हे यातून मांडण्यात आलं आहे… यात अभिनेता जिम सरभ (Jim Surbh) चार्ल्सच्या भूमिकेत असून मनोज वाजयेपी झेंडंची भूमिका साकारणार आहे… या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत मनोज यांनी मुंबई सोडण्याचा विचार मनात आल्याचं विधान केलं होतं.. नेमकं काय म्हणाले मनोज जाणून घेऊयात… Box office collection  मनोज बाजपेयी यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाविषयी म्हणाले की, “जेव्हा मला सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली तेव्हा वाटलं की एक गंभीर थ्रिलर फिल्म असेल. पोलिसांच्या संघर्षाची कथा असेल. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा फार मजा आली. मला सारखं हसू येत होतं. स्क्रिप्टमध्ये कॉमेडी बळजबरी घुसवली आहे असं कुठेच वाटलं नाही. यात अभिनय करताना क...

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर प्रेक्षकांची ‘ही’ आवडती मालिका घेणार लवकरच निरोप !

Image
  टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी सतत नवनवीन प्रयोग करत असते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काही नवीन मालिका झटपट सुरु होतात, तर काही आवडत्या मालिकांना अचानक पूर्णविराम मिळतो. स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडे दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जुन्या मालिकांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका संपणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.(Aai Ani Baba Retire Hot Aahet) Latest Marathi movies ही मालिका म्हणजे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. ही कौटुंबिक मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. परंतु आता सोशल मीडियावर मालिकेच्या लवकरच संपुष्टात येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ देखील संपणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षक निराश झाले आहेत. या मालिकेत किल्लेदार कुटुंब दाखवण्यात आलं होतं. घरचे प्रमुख यशवंत किल्लेदार हे निवृत्त झालेलं पात्र, त...

‘Bigg Boss’ शो ची कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून? कसा बनला भारताचा सर्वाधिक हिट शो?

Image
  भारतातील टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शोजची क्रेझ नेहमीच जबरदस्त राहिली आहे. पण जर सर्वाधिक लोकप्रिय शो कोणता असा प्रश्न विचारला, तर एकच नाव समोर येतं ते म्हणजे ‘बिग बॉस’. प्रेक्षक दरवर्षी याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की हा शो भारतात नेमका कधी सुरु झाला, त्याचं कॉन्सेप्ट कुठून आलं आणि यशाचं रहस्य नेमकं काय आहे? खरं तर, ‘बिग बॉस’ हा कुठलाही ओरिजनल भारतीय शो नाही. हा शो ब्रिटिश रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’ वर आधारित आहे. ‘बिग ब्रदर’ हा शो १९९७ मध्ये ब्रिटिश निर्माता जॉन डी मोल यांनी तयार केला होता. त्यामागचा उद्देश साधा होता की, लोकांना सेलिब्रिटींचं खरं जीवन, त्यांच्या नातेसंबंधातील चढउतार, वादविवाद आणि नाट्य थेट टीव्हीवर पाहता यावं. (Bigg Boss Reality Show) Bollywood Tadka  या शोची प्रेरणा जॉर्ज ऑरवेल यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘नाइन्टीन एटी-फोर’ मधून घेतली गेली होती. त्या पुस्तकात एका तानाशाही जगाची कल्पना मांडली आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीवर सतत नजर ठेवली जाते. ह्याच संकल्पनेतून ‘बिग ब्रदर’ शोचा जन्म झाला. सन २००० मध्ये ‘बिग ब्रदर’ प्रथम...