Posts

50 Years of Charas : अखेरच्या क्षणी सेन्सॉरने म्हटले, चित्रपटाचे नाव बदला !

विदेशात अनेक ठिकाणी चित्रीकरण झाले, चित्रपटात अनेक खलनायक असल्याने मारधाड वाढली, चित्रपटाचे एकूणच बजेट वाढवावे लागले, तेही केले आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे दिला आणि सेन्सॉरने पहिला सल्ला दिला, या चित्रपटाचं नाव बदला… यामागचे कारण काय, तर देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली असून चित्रपट सेन्सॉर करण्यासाठीचे नियमही बदलले आहेत. त्यात ‘CHARAS’ हे नाव चित्रपटाला अजिबात चालणार नाही. अजून आणीबाणी कायम आहे हे सेन्सॉरचे म्हणणं. अनुभवी निर्माता आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांना प्रश्न पडला, आता काय करायचं? मुहूर्तापासूनच या चित्रपटाचे नाव ‘चरस’ आहे.‌ तेव्हापासून चित्रपट पूर्ण होईपर्यंत अनेकदा त्याच्या दोन चार रिळाच्या चित्रीकरणानंतर सतत बातम्या येत राहिल्या.‌ आता चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत, चित्रपटाची अनेक शहरांतून पोस्टर्स, होर्डिंग्जही लागली आहेत, अशा वेळी ऐन वेळी नाव कसे बदलणार? ते करायचं तर खूपच मोठा खर्च आला. सेन्सॉरला हे म्हणणं पटलं आणि ‘चरस’ सेन्सॉर संमत होऊन २८ मे १९७६ रोजी चित्रपट दणक्यात प्रदर्शित झाला. त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत...

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या पहिल्या सिंहली (श्रीलंकन) भाषेतील गाण्याचा किस्सा!

  Lata Mangeshkar यांनी भारतातील जवळपास सर्व प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहे. लताच्या स्वरातील मधुरतेने त्या त्या भाषेतील शब्दांना सुरेल पण दिलं. आज इतक्या वर्षानंतर देखील ती सर्व गाणी रसिक आवडीने ऐकत असतात. लता दीदींनी केवळ भारतातील प्रादेशिक भाषांमध्येच नाही तर काही परदेशी भाषांमध्ये देखील गाणी गायली. आपले शेजारी राष्ट्र Sri Lanka या देशातील सिहली भाषेत लता दीदींनी गाणे गायले आहेत. या गीताला श्रीलंकेत राष्ट्रगीता इतकाच सन्मान मिळत असतो. सिंहली भाषेतील लता दीदींनीच्या पहिल्या गाण्याचा किस्सा खूप Interesting आहे. ( Lata Mangeshkar ) श्रीलंकेतील एक चित्रपट निर्माते T. Somasekaran यांनी आपल्या Seda Sulang चित्रपटात लताने गावे म्हणून ते खास भारतात मुंबईला लताला येऊन भेटले लता दीदींनी त्यांची विनंती मान्य केली आणि पहिल्या सिंहली भाषेतील लताच्या गाण्याचा जन्म झाला. लता त्या वेळी भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका होती. या गाण्याला संगीत Ananda Samarakoon या श्रीलंकन संगीतकाराने दिले होते. हे संगीतकार Gurudev Rabindranath Tagore यांचे शिष्य होते. संगीत आणि चित्रकला याची त्यांन...

Comedian Mehmood : यांनी अभिनेता सुंदरजींना त्याच्या वृध्दापकाळी अनमोल मदत केली होती !

सिनेमाची दुनिया ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी दुनिया आहे इथे मावळणाऱ्या सूर्याच्या मागे कोणी जात नाही. कलाकारांचे आयुष्य असेच असते. एकदा का तुमच्यावरील लाईम लाईट चा झोत गेला की तुम्हाला कुणी ओळखत नाही. आज ही परिस्थिती राहिली नाही कारण आज मीडिया आला आहे. माध्यमाच्या कुठल्यातरी प्लॅटफॉर्म वर तुम्हाला ओळख मिळत असते . पण तीस चाळीस वर्षा पूर्वी असला प्रकार नव्हता. त्या काळात असे अनेक कलाकार होते जे आपल्या सिनेमाची ओळख पुसून सर्व सामान्यप्रमाणे जीवन जगत होते. त्या काळात मीडिया आजच्या इतका प्रबळ नव्हता त्यामुळे या कलाकारांचे फोटो देखील लोकांना माहीत नसायचे. त्यामुळे अनेक कलाकार हे अंधारगर्तेत आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध जगत होते. त्यापैकीच एक होता हास्य कलाकार Sunder पन्नास आणि साठ च्या दशकात कॉमेडीयन सुंदर ने रसिकांची चांगली पसंती मिळविली होती. त्याने 1938 ते 1980 हा तब्बल चाळीस – पन्नास वर्षाचा कालखंड सिनेमांमध्ये घालवला. जवळपास चारशे हून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. पंजाबी सिनेमात तर नायक होते. Solva Saal, Mere Mehboob, Padosan, Apna Desh, Charas, Pratigya, Betaab, A...

Ismat Chughtai यांच्या वादग्रस्त कथेवरील ‘लिहाफ’ सिनेमा बघितला का?

स्त्रियांचे समलिंगी संबंध अर्थात लेस्बियन हा विषय आज देखील बोल्ड समजला जातो पण याच विषयावर 1940 साली लेखिका इस्मत चुगताई यांनी एक कथा लिहिली होती. लक्षात घ्या या बोल्ड कथेने नव्वद वर्षापूर्वीच्या त्या सनातनी वातावरणात काय वादळ निर्माण झाले असेल? तिच्यावर लाहोर कोर्टात खटला दाखल झाला. या सर्व प्रकारांवर मध्यंतरी Lihaaf हा सिनेमा येवून गेला पण गंमत म्हणजे त्यावर फारशी चर्चा झाली नाही. हा सिनेमा दुर्लक्षित राहिला की समाज मॅच्युअरड झाला ? पुरोगामी स्वतंत्र वैचारीक बाण्याच्या Ismat Chughtai यांची कला कारकीर्द भन्नाट होती! १९७४ सालच्या Garm Hava या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअरचा पुरस्कार देखील पटकावला होता. या चित्रपटाच्या लेखिका होत्या इस्मत चुगताई. आज हे नाव कुणाला आठवण्याची शक्यता नाही. Ismat Chughtai (२१ ऑगस्ट १९११ – २४ ऑक्टोबर १९९१) या एक भारतीय उर्दू कादंबरीकार, कथालेखिका, उदारमतवादी मानवतावादी आणि चित्रपट निर्मात्या होत्या. १९३० च्या दशकात आपल्या लेखनाची सुरुवात करताना, त्यांनी स्त्रीची लैंगिकता व स्त्रीत्व, मध्यमवर्गीय सुसंस्कृतपणा आणि वर्गसं...

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?

  अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ? अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा बॉलीवूड चे दोन महान कलाकार.  एक कमर्शियल सिनेमाचा शहेनशहा तर दुसरा आर्ट  फिल्म चा आयकॉनिक ऍक्टर. या दोन कलाकारांनी आजवर कधीच एकत्र काम केलेले नाही आणि भविष्यात एकत्र काम करण्याची सुतराम शक्यता नाही! या दोघांना घेऊन एखादा चित्रपट करावा असे कुणा निर्मात्याला ही कधी वाटले नाही. नासिर ने काही कमर्शियल सिनेमे नक्कीच केले. अमिताभ बच्चन यांनी देखील काही आर्ट फिल्म्स केल्या.  पण या दोघांचं करिअर समांतरच राहिले! अमिताभ बच्चन कधीच कोणत्याही कलाकारावर आपत्ती जनक टिप्पणी करत नाही.  अमिताभ नेहमीच एका स्टॅंडर्ड उंचीवर राहून लाईम लाईट मध्ये  वावरत असतो.   या उलट नसिरुद्दीन शहा ने एकदा एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि त्याच्या चित्रपटावर भरपूर टीका केली होती. या मुलाखतीत त्याने अमिताभ बच्चन काही महान कलाकार महान वगैरे कलाकार नाहीत  असे जाहीर पणे सांगितले होते .   तो केवळ स्टंट मन एक बिझनेसमन आहे आणि त्या पद्धतीने तो या व्यवसायात आलेला आहे असे  उदगार देखील क...

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

  मराठी सिनेमा हा कायमच नवनवीन, धाडसी विषयांना हात घालण्यासाठी ओळखला जातो. याच कडीत दिग्दर्शक समीर तिवारी यांचा Baapya Movie एक अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची, संघर्षाची नाही, तर त्यापलीकडे जाऊन समाज, कुटुंब व मानवी नात्यांच्या मानसिकतेचीही परीक्षा घेणारी आहे. समाजात Tabbo मानल्या जाणाऱ्या अनेक विषयांपैकी एक विषय घेऊन त्यावर मराठीत सिनेमा बनवण्याचं धाडस करण्यासाठी निर्मात्यांचं खास कौतुक करायला हवं! चित्रपटाची कथा सुरू होते ती, कोकणातल्या एका गावात! शैला ( Rajshri Deshpande ) जी अनेक वर्षांनी आपल्या गावी परतते, ती थेट ‘शैलश’ बनून! तिचं हे बदललेलं रूप तिच्या कुटूंबाला व संपूर्ण गावालाच थक्क करतं. तिचं बालपण, मनाची अवस्थता, कुटुंबात होणारी भावनिक उलथापालथ आणि या सगळ्यातून स्वतःची ओळख शोधण्याचा व ते अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष म्हणजे ‘बाप्या’! ‘बाप्या’ हा केवळ एका ‘स्त्री’तील पुरूषाच्या अस्तित्वाचा प्रवास नाही, तर तो समाजातल्या बदलांचा देखील प्रवास आहे. कोकणासारख्या गावात ‘Trans-Men’ सारख...

ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘चुपके चुपके’या सिनेमाचे शूटिंग ‘जलसा’ या बंगल्यात झाले होते!

ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘ चुपके चुपके ‘ या सिनेमाचे शूटिंग ‘जलसा’ या बंगल्यात झाले होते! ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ (१९७५) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात  निखळ आनंद देणारा कौटुंबिक विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. उपेन्द्रनाथ गांगुली यांच्या ‘छद्मवेशी’ या बंगाली कथेवर आधारित हा चित्रपट आजही तितकाच ताजातवाना वाटतो. चित्रपटाची कथा अतिशय साधी पण खुसखुशीत आहे. वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक परिमल त्रिपाठी (धर्मेंद्र) यांचे लग्न सुलेखाशी (शर्मिला टागोर) होते. सुलेखा तिचे ‘जीजाजी’ राघवेंद्र शर्मा (ओम प्रकाश) यांच्या बुद्धिमत्तेची आणि आदर्शवादाची सतत स्तुती करत असते. हे पाहून परिमलला एक खोडसाळ कल्पना सुचते. जीजाजींना ‘मूर्ख’ बनवण्यासाठी परिमल त्यांच्या घरी ‘प्यारेलाल’ नावाचा ड्रायव्हर बनून जातो जो शुद्ध हिंदी बोलतो. यातून निर्माण होणारे गैरसमज आणि विनोदी प्रसंग म्हणजे हा चित्रपट. ऋषिकेश मुखर्जी यांना ‘मध्यममार्गी  सिनेमाचे सम्राट’ म्हटले जाते. ‘चुपके चुपके’ मध्ये त्यांनी कुठेही बटबटीत विनोद किंवा अश्लीलतेचा आधार घेतलेला नाही. चित्रपटाचा वेग मध्यम असून संवादफेकीवर ...