Posts

Showing posts from June, 2025

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Image
  २०२५ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी फार खास आहे असं नक्कीच दिसतंय… ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’, ‘जारण’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासह बॉक्स ऑफिसवरही छान कमाई करत आहेत… वेगळे विषय आणि आशय प्रेक्षकांसमोर मांडताना मराठी मातीतला तो रांगडेपणा पुन्हा एकदा मराठी चित्रपटांमध्ये दिसतोय.. मात्र, काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पथ्याला पडला नाही… आता चित्रपटातील नायिकेनेच चित्रपट का चालला नाही यावर उत्तर दिलं आहे…(Marathi Movies 2025) Latest Marathi Movies प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी हे दोघे मुख्य भूमिकेत होते. दोन अनोळखी माणसं एकाच घरात एका खोलीत बंद होतात आणि त्यानंतर दोघांच्या वैयक्तिक जीवनात काय घडामोडी घडतात असं चित्रपटाचं कथानक… पण हा चित्रपट चालला नाही… प्रेक्षकांना अपेक्षेपेक्षा बोल्डपणा चित्रपटात दाखवला असं वाटलं… आता चित्रपट का चालला नाही याबद्दल सोनालीने तिचे मत व्यक्त केलं आहे. अमोल परचुरेंच्या कॅचअपमध्ये याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली की, “‘सुशीला स...

Vidya Balan ची मराठी मालिकेत दमदार एंट्री ; ‘या’ मालिकेत झळकणार शिक्षिकेच्या भूमिकेत !

Image
  नेहमीच आपल्या भूमिकांमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.आज ती बॉलिवूडमधील एक यशस्वी, दमदार आणि वैविध्यपूर्ण अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप काही झेलावं लागलं आहे. विद्याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली. ‘हम पांच’या लोकप्रिय मालिकेमधून तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत ती अशोक सराफ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. चित्रपटसृष्टीकडे वळल्यावर तिला लगेच संधी मिळाली नाही. अनेक चित्रपटांमधून नकार मिळाले, काही प्रोजेक्ट्स अर्धवट राहिले, तर काहींमध्ये तिला बदलून टाकण्यात आलं. तरीही तिनं हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, स्वतःवर विश्वास ठेवत तिनं संघर्ष सुरू ठेवला.आज तिचं नाव ‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘परिणीता’, ‘तुम्हारी सुलु’ सारख्या अनेक हिट आणि स्त्रीप्रधान सिनेमांसोबत घेतलं जातं. 2005 साली आलेला ‘परिणीता’ हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.या चित्रपटात विद्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं आणि बॉलिवूडमध्ये तिचं नाव ‘सशक्त अभिनेत्री’ म्हणून घेतलं जाऊ लागलं. ‘परिणीता’नंतर वि...

The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु राजगुरु यांच्यात सामना!

Image
  महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कलावंतांचा गुणगौरव राज्य पुरस्कार देत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामांकित निर्मिती संस्थासोबत यंदा वर्ध्यातील दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या तेरवं चित्रपटाची वर्णी लागली आहे. जाणून घेऊयात इतर नामांकनं…(The Maharashtra State Film Awards) Bollywood Masala ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने पटकावणारे चित्रपट पुढीलप्रमाणे; ‘आत्मपॅम्प्लेट’, ‘जिप्सी’, ‘नाळ २’, ‘रौंदळ’, ‘तेरवं’, ‘जग्गु’ आणि ‘ज्युलिएट’, ‘भेरा’, ‘आशा’, ‘झिम्मा २’ आणि ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’. यासोबत कबीर खंदारे (‘जिप्सी’) आणि त्रिशा ठोसर (‘नाळ २’) या बालकलाकारांनीआपल्या अभिनयानं रसिकांच्या हृदयात घर केलं असून, त्यांना उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.(Marathi Movies 2025) =============================== हे देखील वाचा: “MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्...

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Image
  अभिनय आणि आपल्या नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चित्रपटांसोबत अध्यात्म्यात गुंतली आहे… काही दिवसांपूर्वीच तिने सहकुटुंब केदारनाथला जाऊन शंकराचं दर्शन घेतलं होतं…तिच्यासोबत या स्पिरिच्युअल जर्नीत अमृता खानविलकर देखील दिसली होती… पण तु्म्हाला माहित आहे का प्राजक्ता माळी हिचं पंढरपूरशी खास नातं आहे.. जाणून घेऊयात त्याबद्दल…(Marathi Entertainment News) Bollywood Tadka सध्या संपू्र्ण महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे… लाखोंच्या संख्येने हजारो वारकरी अभंग गात वारीत सहभागी झाले आहेत.. आणि याच भक्ती भावनेने वेढलेल्या पंढरपूरसोबत प्राजक्ताचं जीवाभावाचं नातं आहे… पंढरपूर हे प्राजक्ताचं आजोळ आहे. पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यात भाळवणीत तिचं आजोळ असून प्राजक्ता आवर्जून तिच्या बिझी स्केड्युलमधून वेळ काढून आजोळी कायम जाते.. भाळवणी हे गाव कावड यात्रेसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे प्राजक्ता या कावड यात्रेला सहकुटुंब हजेरी लावत असते…(Latest Entertainment News) ================================ हे देखील वाचा: Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसो...

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni ने स्पष्टच सांगितल…

Image
  Sonalee Kulkarni ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहे. तिने केवळ मराठीतच नाही, तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. तिच्या अभिनयाबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. काही काळापूर्वी सोनाली विषयी एक अफवा पसरली होती, ज्यामध्ये असं म्हटलं जात होतं की तिचं लग्न एका राजकीय नेत्यासोबत झालं आहे आणि त्या नेत्याने तिला राहण्यासाठी घरही दिलं आहे. या अफवेवर तिनं स्पष्टपणे भाष्य केलं होतं. ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तिने या चर्चेवर खुलं मत मांडलं.(Sonalee Kulkarni Marriage) सोनाली म्हणाली की, ही अफवा पसरल्यानंतर तिच्याकडे अनेकांचे फोन आले होते. तिच्या चुलत बहिणीनंही थेट तिला फोन करून विचारलं होतं की खरंच लग्न झालंय का? त्यावर सोनालीनं हसत हसत उत्तर दिलं की, “माझं खरंच लग्न झालं असतं, तर तुला नक्की बोलवलं असतं.” पण त्या बहिणीनंही ऐकलेली अफवा तिला सांगितली – की सोनालीनं एका पॉलिटिशनसोबत लग्न केलं आहे आणि त्यानं तिला घर दिलं आहे. हे ऐकून सोनाली काही क्षण स्तब्ध झाली होती, पण...

Kaalidhar Laapata : अभिषेक बच्चनच्या कामाचं प्रेक्षकांसह बिग बींनीही केलं कौतुक!

Image
  हाऊसफुल्ल ५ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेत आलेला अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या आगामी कालिधर लापता चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. कॉमेडी भूमिका जरी अभिषेक बऱ्यापैकी साकारत असला तरी दसवी, पाँ किंवा कालिधर लापता अशा चित्रपटांमध्ये त्याला त्याचं अभिनय कौशल्य खऱ्याअर्थाने प्रेक्षकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडता येतं… नुकताच अभिषेक बच्चन याच्या ‘कालिधर लापता’ (Kaalidhar Laapata) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षक त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत…(Bollywood) अभिषेक बच्चन याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘कालिधर लापता’ चित्रपटाची कथा मध्यमवयीन पुरुष आणि एका लहान मुलाच्या मैत्रीभोवती फिरते… चित्रपटात माणसाच्या आयुष्यातील दु:ख, आनंद, लोभ अशा विविध भावनांचा एक वेगळा आणि अलौकिक प्रवास या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे… आजूबाजूच्या गर्दीच्या लोंढ्यात भावंडांच्या क्रुर योजनेमुळे कालिधर स्वत:च्या मर्जीने गायब होण्याचा निर्णय घेतो आणि योगायोगाने एका लहान मुलाशी त्याची भेट होते आणि त्यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु होतो… पुढे आता तो त्याच्या घरच्यांना सापडणार ...

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला टक्कर देणार Ranbeer-Alia च आलिशान घर; किंमत आहे थक्क करणारी !

Image
  Bollywood मध्ये जेव्हा लक्झरी आणि आलिशान घरे यांचा विषय निघतो, तेव्हा शाहरुख खानच्या (SRK) ‘मन्नत’चं नाव नेहमीच सगळ्याच  वर घेतलं जातं. सुमारे २०० कोटी रुपये किंमत असलेल्या ‘मन्नत’ची ओळख म्हणजे बँडस्टँड, बांद्रा येथील समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं एक भव्य ६ मजली बंगला. यात जिम, प्रायव्हेट थिएटर, स्विमिंग पूल, लायब्ररी आणि खास बार अशा सर्व लक्झरी सोयी उपलब्ध आहेत. हे घर शाहरुखनं २००१ मध्ये १३.३२ कोटींना खरेदी केलं होतं. त्याचे इंटीरियर गौरी खान हिने स्वतः  डिझाईन केलं असून हे घर आता पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. (Ranbeer-Alia’s New Home) Box Office Collection मात्र आता या यादीत आणखी एक स्टार जोडपं प्रवेश करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांच्या नव्या घराने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नव्या घराची किंमत तब्बल २५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे हे घर त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर म्हणजेच राहा कपूरया नावाने रजिस्टर केलं आहे. पाली हिल सारख्या मुंबईतील सर्वात पॉश भागात हे घर वसलेलं असून, या परिसरातील प्रत्येक स्क्वेअर फूटची किंमत...

Sayaji Shinde यांचा ऑल इज वेल चित्रपटात हटके अंदाज!

Image
  मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा हटके अंदाजात दिसणार आहेत. आगामी ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे भाईगिरी करताना दिसणार आहेत. मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा सयाजी या चित्रपटात सादर करणार आहेत. Bollywood Masala ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे ‘आप्पा’ या भूमिकत दिसणार आहेत. हा भाई शुद्ध मराठीत बोलत अनेकांची विकेट काढताना दिसणार आहे. त्यांच्या या मराठी बोलण्याने काय धमाल उडते याची सगळी गंमत चित्रपटात रंगत आणणार आहे. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. आपल्या भूमिकेबद्दल सयाजी शिंदे म्हणतात, ‘आप्पा ही भाईगिरी करणाऱ्या डॉनची व्यक्तिरेखा असली तरी त्यात काहीतरी वेगळेपणा आणि रंगत आणावी या उद्देशाने आमच्या लेखक-दिग्दर्शकांनी शुद्ध मराठी भाषेची गंमत त्या व्यक्तिरेखेसाठी वापरली आहे. शुद्ध मराठी भाषेच्या गोडव्यामुळे ही व्यक्तिरेखा आणि त्यातली ग...

Aamir Khan आणि पाकिस्तानबद्दलची ‘ती’ विधानं!

Image
  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने आजवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले.. ‘लगान’,सरफरोश,राजा हिंदुस्तानी, पीके, गजनी… लिस्ट फार मोठीच आहे… सध्या आमिर त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचं प्रमोशन करतोय आणि याचवेळी बऱ्याचशा मुलाखतींमध्ये गौप्यस्फोट करतोय… आमिर खान कधीच पाकिस्तानबद्दल काहीच बोलला नाही किंवा आपली बाजू मांडत नाही असं म्हटलं गेलं… मात्र, आता आमिरचं पाकिस्तानबद्दलची दोन विधानं ट्रेण्डींग आहेत… काय आहे किस्सा जाणून घेऊयात…(Aamir Khan And Pakistan) Bollywood Tadka शक्यतो चित्रपटांमध्ये पाकिस्तान देशाचा उल्लेख डायरेक्ट न करता पडोसी मुलूख किंवा शेजारचा देश असा करावा असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं… पण बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचं डायरेक्ट नाव चक्क आमिर खानच्या एका चित्रपटात घेतलं गेलं होतं.. याबद्दलच आमिरने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे… आमिर म्हणाला की, “जर लाल कुष्ण अडवाणीजी संसदेत पाकिस्तान आपल्याशी गैरवर्तन करतोय आणि दहशतवाद पसरवतोय हे बोलू शकतात मग आपण चित्रपटात का म्हणू शकत नाही?”. ‘सरफरोश’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड...

Arun Kadam : मुलीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची वेळ का आली?

Image
  आपल्या मुलांना कुठल्याच अडचणींचा कधीच एकट्याने सामना करावा लागू नये अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते… त्यामुळे आपल्या मुलांना सगळ्या सुख-सोयी देण्याचा पुरेपुर प्रयत्न पालक करत असतात… असाच काहीसा कठिण प्रयंग मनोरंजनसृष्टीतील दादुस अर्थात अरुण कदम यांच्या लेकीवर ओढवला होता… लेकीला वाचवण्यासाठी चक्क अरुण कदम यांनी हेलिकॉप्टर पाठवलं होतं… काय घडलेला किस्सा जाणून घेऊयात…(Entertainment tadaka) लोकशाहीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरुण कदम यांची मुलगी सुकन्या हिने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. सुकन्या म्हणाली की, “मी आणि वैशाली शिमल्याला गेलेलो, तेव्हा खूप स्नो फॉल झाला होता. सगळी वाहतूक, रस्ते बंद झाले होते. आम्ही हॉटेलमध्ये अडकलो होतो. आणि स्नो फॉलमुळे रस्ते बंद असल्याकारणाने गाडी पण आमची निघू शकत नव्हती… पप्पांचं शुटींग चालू होतं म्हणून आमच्यासोबत ते आले नव्हते… आम्ही अडकलोय हे समजल्यावर त्यांचं काळीज वर खाली होऊ लागलं… आम्हाला तिथून सुखरुप बाहेर काढण्यासाठी बऱ्याच लोकांना फोन करुन शिमल्यात आमच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं होतं..(Bollywood news) Latest Marathi Movies ===========...