Posts

Showing posts from September, 2025

Manoj Bajpayee : “मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही”

Image
  चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende) हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात अभिनेते मनोज बाजपेयी प्रमुख भूमिका साकारणार आहेत… कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजला दोनदा जेरबंद करणाऱ्या मराठमोळ्या मधुकर झेंडे यांच्यावर चित्रपटाचं कथानक आधारित असून इन्स्पेक्टर झेंडेंनी मुंबईभर त्याला शोधण्याची मोहीम कशी राबवली होती हे यातून मांडण्यात आलं आहे… यात अभिनेता जिम सरभ (Jim Surbh) चार्ल्सच्या भूमिकेत असून मनोज वाजयेपी झेंडंची भूमिका साकारणार आहे… या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत मनोज यांनी मुंबई सोडण्याचा विचार मनात आल्याचं विधान केलं होतं.. नेमकं काय म्हणाले मनोज जाणून घेऊयात… Box office collection  मनोज बाजपेयी यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाविषयी म्हणाले की, “जेव्हा मला सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली तेव्हा वाटलं की एक गंभीर थ्रिलर फिल्म असेल. पोलिसांच्या संघर्षाची कथा असेल. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा फार मजा आली. मला सारखं हसू येत होतं. स्क्रिप्टमध्ये कॉमेडी बळजबरी घुसवली आहे असं कुठेच वाटलं नाही. यात अभिनय करताना क...

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर प्रेक्षकांची ‘ही’ आवडती मालिका घेणार लवकरच निरोप !

Image
  टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी सतत नवनवीन प्रयोग करत असते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काही नवीन मालिका झटपट सुरु होतात, तर काही आवडत्या मालिकांना अचानक पूर्णविराम मिळतो. स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडे दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जुन्या मालिकांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका संपणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.(Aai Ani Baba Retire Hot Aahet) Latest Marathi movies ही मालिका म्हणजे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. ही कौटुंबिक मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. परंतु आता सोशल मीडियावर मालिकेच्या लवकरच संपुष्टात येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ देखील संपणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षक निराश झाले आहेत. या मालिकेत किल्लेदार कुटुंब दाखवण्यात आलं होतं. घरचे प्रमुख यशवंत किल्लेदार हे निवृत्त झालेलं पात्र, त...

‘Bigg Boss’ शो ची कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून? कसा बनला भारताचा सर्वाधिक हिट शो?

Image
  भारतातील टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शोजची क्रेझ नेहमीच जबरदस्त राहिली आहे. पण जर सर्वाधिक लोकप्रिय शो कोणता असा प्रश्न विचारला, तर एकच नाव समोर येतं ते म्हणजे ‘बिग बॉस’. प्रेक्षक दरवर्षी याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की हा शो भारतात नेमका कधी सुरु झाला, त्याचं कॉन्सेप्ट कुठून आलं आणि यशाचं रहस्य नेमकं काय आहे? खरं तर, ‘बिग बॉस’ हा कुठलाही ओरिजनल भारतीय शो नाही. हा शो ब्रिटिश रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’ वर आधारित आहे. ‘बिग ब्रदर’ हा शो १९९७ मध्ये ब्रिटिश निर्माता जॉन डी मोल यांनी तयार केला होता. त्यामागचा उद्देश साधा होता की, लोकांना सेलिब्रिटींचं खरं जीवन, त्यांच्या नातेसंबंधातील चढउतार, वादविवाद आणि नाट्य थेट टीव्हीवर पाहता यावं. (Bigg Boss Reality Show) Bollywood Tadka  या शोची प्रेरणा जॉर्ज ऑरवेल यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘नाइन्टीन एटी-फोर’ मधून घेतली गेली होती. त्या पुस्तकात एका तानाशाही जगाची कल्पना मांडली आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीवर सतत नजर ठेवली जाते. ह्याच संकल्पनेतून ‘बिग ब्रदर’ शोचा जन्म झाला. सन २००० मध्ये ‘बिग ब्रदर’ प्रथम...